baby
baby 
नागपूर

आता तीन वर्षांच्या आत होणार व्यंगत्वाचे निदान

मंगेश गोमासे

नागपूर : मुलांमध्ये नेमके कोणते व्यंग आहे हे कळायला आई वडिलांना किमान ३ ते ५ वर्ष लागतात. अनेकदा उपचारास उशीर झाल्याने समस्या अधिकच बिकट होते. त्यामुळे लवकरात लवकर त्याचे निदान होऊन त्यावर योग्य उपचार करणे गरजेचे असते. अशा मुलांची वेळेवर तपासणी व्हावी यासाठी सामाजिक न्याय विभागाने विशेष शाळेत निदान व उपचार केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहे.

लहान बालकांमधील व्यंग बरेचदा समोर येत नसल्याने पालकांच्या समस्येत वाढ होते. जन्मानंतर जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर त्यावर उपाय करता येणे शक्य असते. मात्र, अनेकदा त्याचा खर्च खूप असल्याने गरीब कुटुंबाला हा खर्च झेपत नाही. त्यामुळे मुलांना कायमचे अपंगत्व येण्याची भीती निर्माण होते. हा विचार करून सामाजिक न्याय विभागाने विशेष शाळेत अशा प्रकारच्या निदान व उपचार केंद्राची सुरुवात केली आहे.

या केंद्रात पालकांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांचे समुपदेशन करण्यात येईल. विशेष म्हणजे फिजिओथेरपी आणि स्पीचथेरेपीद्वारे मुलांमधील दोष दूर करता येतील. या सर्व सेवा नि:शुल्क राहणार आहेत. यासाठी शाळांकडून आशा वर्करची मदत घेण्यात येईल. त्यांच्यामार्फत जनजागृती, दिव्यांगांची ओळख व निदान करणे , मूळ दिव्यांगत्वाबरोबर अन्य स्वरूपात दिव्यांगत्व आले आहे का याचे निदान करून उपाय योजना करणे व त्यानुसार मुलांना आवश्यक सेवा पुरविणे इत्यादी कामे करण्यात येतील.

शंकरनगर मूकबधिर शाळेत अत्याधुनिक केंद्र
सामाजिक न्याय विभागाच्या मदतीने शहरातील शंकनगर येथे मूकबधिर शाळेत यासाठी अत्याधुनिक सोयीसह केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रात शून्य ते ३ वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करून त्याच्या आजाराबाबत समुपदेशन आणि उपचाराची सोय करून देण्यात येणार आहे. यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्व सेवा नि:शुल्क राहणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. मीनल सांगोळे यांनी दिली.


संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT