नागपूर

काँग्रेसमध्ये वाद; बैठकीत वंजारी-हजारे समर्थक भिडले

राजेश चरपे

नागपूर : महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. रविवारी आमदार तसेच नवनियुक्त प्रदेश महासचिव अभिजित वंजारी यांना कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. भाषण सुरू असतानाच पुरुषोत्तम हजारे यांनी वंजारी यांच्यासमोरील माइक फेकला तर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गोंधळ घालून सभा उधळून लावली.

महापालिका निवडणुकीच्या तयारीअंतर्गत रविवारी रात्री पारडी येथे लॉनमध्ये ब्लॉक क्रमांक दोनच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. ब्लॉक अध्यक्ष युवराज वैद्य यांनी ही बैठक बोलावली होती. बैठकीत अभिजित वंजारी यांचे भाषण सुरू असतानाच पुरुषोत्तम हजारे समर्थकांसह तेथे दाखल झाले. आम्हाला बैठकीला का बोलावण्यात आले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नंतर हजारे समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. माइक फेकला, टेबल व खुर्च्या फेकल्या. त्यामुळे बैठकच गुंडाळावी लागली. विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत हजारे काँग्रेसचे उमेदवार होते. ते नगरसेवकसुद्धा आहेत. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे ते कट्टर समर्थक आहेत.

आपणास व आपल्या समर्थकांना मुद्दामच बैठकीला बोलावले नव्हते. ज्या ठिकाणी बैठक घेण्यात आली जवळच आपले घर आहे. याच परिसराचा मी नगरसेवक आहो. काँग्रेसच्या बैठकीचे निमंत्रण नाकारून आपला अपमान करण्यात आला. हा विषय पक्षाच्या मंचावर नेण्यात येईल, असे पुरुषोत्तम हजारे यांचे म्हणणे आहे. बैठकीचे आयोजक युवराज वैद्य यांनी हजारे संघटनेचे पदाधिकारी नसल्याने त्यांना बोलावले नव्हते असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT