Loss by Untimely Rain sakal
नागपूर

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; बळीराजा धास्तावला

खरीपाच्या नुकसानीतून उभं येत असलेल्या सर्व निसर्गाच्या संकटातून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा अवकाळी पावसाने फटका दिला आहे.

मनोज खुटाटे

खरीपाच्या नुकसानीतून उभं येत असलेल्या सर्व निसर्गाच्या संकटातून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा अवकाळी पावसाने फटका दिला आहे.

जलालखेडा (जि. नागपूर) - खरीपाच्या नुकसानीतून उभं येत असलेल्या सर्व निसर्गाच्या संकटातून (Natural Disaster) जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा अवकाळी पावसाने (Untimely Rain) फटका दिला आहे. नरखेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान (Loss) झालं आहे. यामुळे आता पुढे काय करावे असा प्रश शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे डोळ्यातून अश्रू पडले असून यातून सावरण्याचा पुन्हा शेतकरी प्रयत्न करणार आहे. पण आलेल्या अस्मानी संतावर मात करण्यासाठी त्याला सुलतानी दिलास्ताची गरज आहे.

आधी पावसाने खरीपाचं नुकसान केलेलं असतानाच आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिट सुरू झाली. नरखेड तालुक्याततील काही भागात सकाळपासून अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीतील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. यात काढणीला आलेली भिजली आहे.

काही शेतकऱ्यांनी हरभरा, गहु पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर तुर पिकाचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काहींची तुर कापणीच्या तयारीत आहे या सर्व फटका हरभरा पिकला व तुरीला या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. तसेच जोमात असलेला गहू पिकाच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.

संत्र्यांच्या बागांनाही मोठा फटका बसलाय. ढगाळ वातावरणामुळे गहू आणि हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव झालाय. काही भागात पावसासह गारपिट झाल्यामुळे याचा हरभरा, गहू, संत्रा, मोसंबी व भाजीपाला पिकांवर परिणाम झाला आहे. खरीपाच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच आता रब्बीवर अवकाळीचं संकट ओढवलंय. बदललेल्या निसर्गचक्रामुळे आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करणं शेतकऱ्यांसाठी अवघड होऊन बसलं आहे. पावसामुळे गारठ्यात वाढ झाली असून भाजीपाला वर्गीय पिकांवर याचा परिणाम होत आहे.

31 तारखेपर्यंत काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. अनेकांची आंब्या बहाराच्या संत्र्याची तोडणी व्हायची आहे. अश्यात वर्षभराच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची शाक्यता आहे.तर आंब्या बहाराच्या फुटीवर यांचा मोठ्या प्रमाणात परिणाम पडण्याची शक्यता आहे.दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT