milind parande sakal
नागपूर

जावेद अख्तर यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी : मिलिंद परांडे

त्यांनी ‘बजरंगी भाईजान’ व ‘न्यूयॉर्क’ चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांच्याही व्यक्तव्याचा समाचार घेतला.

राजेश प्रायकर @rajeshp_sakal

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची तुलना तालिबान्यांशी केल्याप्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी विहिंपचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी आज पत्रकारपरिषदेत केली. एवढेच नव्हे 'एम्पायर’ सिरिजमधून मंदिरे पाडणाऱ्या बाबरचे उदात्तीकरण होत असून ती बंद करण्यात यावी, असेही ते म्हणाले. त्यांनी ‘बजरंगी भाईजान’ व ‘न्यूयॉर्क’ चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांच्याही व्यक्तव्याचा समाचार घेतला.

धंतोली येथील विहिंप कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. जावेद अख्तर कवी असून प्रसिद्ध चेहरा आहे. त्यांचे वक्तव्य देशातील सौहार्दाच्या वातावरणाला सुरुंग लावणारे व पूर्वग्रहदूषित भावनेने प्रेरित आहे. त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे, असे परांडे म्हणाले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखविण्यात येत असलेल्या ‘एम्पायर’ सिरिजमधून भारतावर आक्रमण करून श्रीराम जन्मभूमी पाडणाऱ्या बाबरचे उदात्तीकरण करण्यात येत आहे. त्याला राष्ट्रनिर्माता म्हणून दाखविल्या जात आहे.

देशातील हिंदूमध्ये भ्रम पसरविण्याचा हा प्रकार आहे. नुकताच शहरात हिंदू तरुणींना जबरदस्तीने बुरखा घालण्यात आला. याविरोधात विहिंपने तक्रार केली. पोलिसांनी संबंधितांकडून माफीनामा घेतला. जबरदस्तीने हिंदू मुलींना बुरखा घालण्यास लावणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. परंतु सरकार या गंभीर प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. हे सर्व प्रकार हिंदू समाजाची आस्था, परंपरा, संस्कृती मिटविण्याचा प्रकार आहे.

हिंदू समाज हे सहन करणार नाही. अशा घटनांविरोधात संबंधित राज्य सरकारांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अशा घटना रोखण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दिग्दर्शक कबीर खान यांनी मुघलांना राष्ट्रनिर्माते असल्याचे सांगितले होते. त्यांच्याही वक्तव्याचा परांडे यांनी खरपूस समाचार घेतला. कबीर खान भारतावर आक्रमण करणाऱ्यांचे उदात्तीकरण करीत असल्याचे ते म्हणाले.

डिसेंबर २०२३ पर्यंत प्रभू श्रीरामाची मूर्ती गर्भगृहात

नुकताच अयोध्या येथील श्री राम मंदिराचे काम बघण्याचा योग आला. पायाचे काम वेगाने सुरू आहे. ते बघता डिसेंबर २०२३ पर्यंत श्रीराम यांची मूर्ती गर्भगृहात असेल, असे ते म्हणाले. मूर्तीच्या स्थापनेनंतरही मंदिराचे काम सुरू राहील. मंदिर पूर्ण होण्यास काही अवधी लागेल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why is SIR Important: भारतात एसआयआर महत्त्वाचे का आहे? निवडणूक आयोगाने चार मोठी कारणे सांगितली!

Mokhada News : सकाळ बातमीचा परिणाम! नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी शेतात.

Bhayandar accident : भाईंदर खाडी परिसरात 'चंदीगड एक्सप्रेस'मधून प्रवासी पडला; रेल्वे प्रशासनाकडून चौकशी होणार!

India SIR Schedule: बिहारनंतर देशातील १२ राज्यांमध्ये एसआयआर लागू, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, जाणून घ्या 'या' राज्यांची नावे

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT