Green chillies tomatoes cheaper by ten rupees 
नागपूर

भाजीचे भाव स्थिरावले असतानाच हिरवी मिरची, टोमॅटो दहा रुपयांनी स्वस्त

राजेश रामपूरकर

नागपूर : जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवारी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यापार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कळमना आणि महात्मा फुले मार्केटमध्ये भाजीची आवक घटलेली असताना ग्राहकांची वर्दळही कमी झालेली आहे. परिणामी, भाजीचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावले आहेत. मात्र, टोमॅटो, हिरवी मिरचीच्या भावात प्रति किलो दहा रुपयाची घसरण झाली आहे.

उन्ह वाढू लागली असून स्थानिक शेतकऱ्यांकडून येणाऱ्या भाज्यांची आवक कमी झालेली आहे. दरम्यान, प्रशासनाने दोन दिवसांचा बंद पुकारल्याने ग्राहकांची बाजारातील वर्दळ कमी झालेली आहे. परिणामी वाढलेल्या स्थितीत भाजीचे भाव स्थिरावलेले आहेत. गेल्या आठवड्यापासून भाजीच्या गाड्यांची आवकही ५० टक्क्यांवर आलेली आहे. सध्या गाड्यांची आवक ८० वर आली आहे. त्यामुळेच भाव स्थिरावलेले आहेत, असे राम महाजन म्हणाले. 

भाजीपाला दर (रुपये प्रतिकिलो) 
वांगे १० 
टोमॅटो १० 
फुलकोबी १०
पानकोबी ०८ 
चवळीच्या शेंगा ४० 
कारले ५० 
गवार शेंगा ४० 
पालक १० 
मेथीची भाजी १२ 
कोहळा १५ 
शिमला मिरची ४० 
कोथिंबीर २० 
भेंडी ३० 
दुधी भोपळा १५ 
काकडी १० 
मुळा १० 
गाजर २० 
हिरवी मिरची १०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT