Home Minister agitated, the central government is saving someone 
नागपूर

गृहमंत्र्यांचे टीकास्त्र, केंद्र सरकार काही लोकांना वाचवतेय

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राज्य सरकार करणार होते. मात्र, केंद्र सरकारने त्यापूर्वीच तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) दिला. हे घटनाबाह्य आहे. आम्हाला याबाबत कळवायला हवे होते. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारला काही लोकांना वाचवायचे आहे, असा संशय येतो. आम्ही याचा निषेध करतो, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. 

राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. महाराष्ट्र सरकारने कोरेगाव भीमा घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरविल्यानंतर केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करून राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता हा तपास एनआयएकडे सोपविला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास अचानक केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवल्याने केंद्र व महाराष्ट्र सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. 

केंद्राची ही कृती राज्यघटनेच्या विरोधात आहे, असा आक्षेप घेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राच्या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास अचानक महाराष्ट्र पोलिसांकडून काढून घेतल्याचे केंद्राकडून महाराष्ट्राचे मुख्य सचिव तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांना कळवण्यात आले आहे. त्यामुळेच केंद्र व राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. 

लीगल ओपिनियन घेतले जाईल

अचानक तपास एनआयएकडे दिल्याने अनेक शंका निर्माण होत आहे. महाराष्ट्र सरकारने कोरेगाव भीमा घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरविल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारला काही लोकांना वाचवायचे आहे, असा संशय येतो. आता यात राज्य सरकारला काय करता येईल यासंदर्भात लीगल ओपिनियन घेतले जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT