जो वेळ द्याल तो पूर्ण ताकदीनिशी द्या! Sakal
नागपूर

UPSC Result 2024 : जो वेळ द्याल तो पूर्ण ताकदीनिशी द्या! यूपीएस्सीत दमदार यश मिळविणारे समीर खोडे यांचा मौलिक सल्ला

स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला तुमच्या आयुष्याची तीन-चार वर्षेच द्यायची आहेत. परंतु जो वेळ द्याल तो पूर्ण ताकदीनिशी द्या. या दिवसांत स्वतःला अभ्यासात झोकून द्या.

अतुल मांगे

नागपूर : स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला तुमच्या आयुष्याची तीन-चार वर्षेच द्यायची आहेत. परंतु जो वेळ द्याल तो पूर्ण ताकदीनिशी द्या. या दिवसांत स्वतःला अभ्यासात झोकून द्या. नक्कीच उद्याची सकाळ तुमचीच असेल, असा मौलिक सल्ला यूपीएस्सी परीक्षेत ४२ वे स्थान मिळविणारे नागपूरकर समीर खोडे तरुणांना देतात.

आपयश तर येणारच; परंतु याच अपयशातून फिनिक्स भरारी घ्या, असे सांगण्यासही ते विसरत नाहीत. यूपीएस्सीत घवघवीत यश मिळविणाऱ्या समीर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी तरुणांना उपयुक्त अशी माहिती दिली.

प्रश्न - स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची प्रेरणा कशी मिळाली?

समीर - माझ्या लहान भावानेसुद्धा यूपीएसस्सीत यश मिळवले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच त्याची इपीएफओमध्ये निवड झाली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मीसुद्धा सात वर्षे खाजगी नोकरी केल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळलो. सुरुवातीला मी लखनऊ विद्यापीठातून आयएम केले आणि त्यानंतर नागपूर व्हीएनआयटीमधून इंजिनिअरिंग केले आणि आता यूपीएसस्सी क्रॅक केली. त्यामुळे माझ्या मते तरी शिक्षणाला कोणतेही बंधन नसते. फक्त तुमची इच्छाशक्ती हवी. तुम्ही काहीही करू शकता.

विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल?

समीर - अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे सतत परीक्षा देत राहिले पाहिजे. शून्यापासून सुरुवात करण्याची तयारी असू द्यावी. वाचन वाढवले पाहिजे. सतत अवेअर असले पाहिजे.

स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी?

दररोज येणारे वृत्तपत्र हेच स्पर्धा परीक्षेसाठी तुमच्या हाती येणार मोठा दस्तऐवज आहे. त्यामुळे दररोज ते वाचलेच पाहिजे. सर्वच बाबतीतील ज्ञान त्यातून मिळते. यूपीएसस्सीची तयारी म्हणा किंवा इतर कोणत्याही परीक्षेची पेपर सेट हाताळले पाहिजेत. समरी वाचावी. याशिवाय एनसीईआरटीची पुस्तके रेफर करून पाया पक्का करावा.

आलेल्या अडचणींवर तुम्ही कशी मात केली?

कोणतीही गोष्ट एका प्रयत्नात मिळत नाही. मुळात ती मिळू नये. कारण त्याशिवाय तुम्हाला त्याचे मोल कळणार नाही. आलेले फेल्युअर विसरून पुढे गेले पाहिजे. अर्थात त्यात झालेल्या चुका पुन्हा होणार नाही, यावर लक्ष असलेच पाहिजे. मला पहिल्या प्रयत्नात आॅप्शनलमध्ये कमी गुण होते. त्यामुळे त्यावर मी भरपूर अभ्यास केला आणि त्रुटी दूर केली.

तरुणांनी कोणते क्षेत्र निवडले पाहिजे?

प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडले पाहिजे. कारण संधी प्रत्येक क्षेत्रा आहेत. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काहीतरी बॅकअप तुमच्यासोबत असला पाहिजे. त्यामुळे आलेल्या अपयशाने निराश न होता तुम्हाला तुमचे क्षेत्र बदलता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard attack Jalgaon : जळगावमध्ये बिबट्याची दहशत; आमदार चंद्रकांत पाटील जखमी, तीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

Asha Bhosle: संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत!

फक्त संगीतातच नाहीतर पाककलेत सुद्धा अव्वल होत्या आशा भोसले, जगभरात रेस्टॉरंट आणि...

Asha Bhosle Video: "मला हे दत्त गुरु दिसले...." ; आशा भोसलेंचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, भावस्पर्शी स्वराने मन भारावलं

Crispy Dosa Secret Reveal: कुरकुरीत डोशामागचं विज्ञान उलगडलं! ‘या’ एका टेस्टमुळे बनतो परफेक्ट डोसा

SCROLL FOR NEXT