pulses rate  sakal
नागपूर

Pulse Rate : मागणीत वाढ, कडधान्य महागली! जाणून घ्या किती आहेत दर

Nagpur latest News In Marathi |काबुली हरभरा, मटकी, हिरवा वाटाण्याचे दर कडाडले; बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक घटली

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : शेतीप्रधान असलेला आपला देश कडधान्याच्या उत्पादनात अजूनही पूर्णपणे स्वयंपूर्ण झालेला नाही. पर्यायाने तूर, उडीद, मसूर, काबुली हरभरा, हिरवा वाटाणा यासारख्या कडधान्याची आयात करावी लागते. यावर्षी तुलनेत काबुली चना, हिरवा वाटाण्याची निर्यात वाढली आहे. त्यामुळे दरही कडाडले.

मुसळधार पावसाच्या तडाख्याने बाजारात भाज्यांची आवक घटल्याने दरही वाढले असून ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. बाजारात येणारा खराब माल आणि भाज्यांची कमतरता यामुळे आता कडधान्यांच्या किंमती वाढल्याचे चित्र आहेत. वधारलेल्या किंमतीत भाजी खरेदी करण्याऐवजी रोजच्या जेवणात कडधान्यांचा वापर करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामीण भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. रविवारपासून पावसाने उघडीप घेतल्याने पालेभाज्यांसह इतर भाज्यांची आवक वाढली असली, तरी पावसामुळे बराचसा माल खराब झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर अद्याप कमी झालेले नाहीत.

सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे भाज्यांचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता आहे. वाढलेल्या किंमतीत भाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहक टाळाटाळ करीत असल्याचे वास्तव असून, कडधान्यांना मात्र मोठी मागणी आहे. मागीलवर्षी तुलनेत पाऊस

कमी झाल्याने कडधान्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला. पर्याने देशात काबुली हरभरा, उडीद, मूग या कडधान्याचे भाव वाढले. देशातील कडधान्य उत्पादनात यंदा मोठया प्रमाणात घट झाल्याने भाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कडधान्य दर - मे -जुलै (प्रति किलो)

  • काबुली चना -१०५ -१४० रुपये

  • हिरवा वटाणा -८५- १२५ रुपये

  • मटकी -८४ -८९ रुपये

देशातील निर्यातीवर परिणाम

भारतातून संपलेल्या आर्थिक वर्षात जवळपास ६ लाख टन कडधान्य निर्यात झाली. मात्र २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात ७ लाख ६२ हजार टन कडधान्य निर्यात झाली होती. भारतातून हरभरा निर्यातही चांगली होत असते. पण यंदा हरभऱ्याच्या किंमती हमीभावापेक्षा १० ते १५ टक्क्यांनी जास्त आहेत. त्यामुळे हरभऱ्याच्या निर्यातीवर परिणाम झाला. परिणामी, काबूली हरभरा, हिरवा वाटाणा आणि मटकीचे भाव वाढले आहे.

पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव वाढलेले आहे. त्यामुळे ग्राहकांकडून पालेभाज्याऐवजी कडधान्याला पसंती दिली जात आहे. तसेच हॉटेल संचालकांकडूनही काबुली हरभरा, हिरव्या वाटाण्याची मागणी वाढल्याने दोन्हीच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे. मटकीचे दरही वाढलेले आहे.

- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर किरकोळ व्यापारी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT