file photo
file photo 
नागपूर

महाज्योती‘चा कारभार प्रभारावर केवळ तीन जण कार्यरत

नीलेश डोये

नागपूर : बार्टी, सारथीच्या धर्तीवर महाज्योती संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेला पूर्ण वेळ अधिकारी नसून तीन कर्मचारी कार्यरत आहे. कर्मचाऱ्यांअभावी काम रेंगाळल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपूर्वीच अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली हे विशेष.

बार्टी, सारथीच्या धर्तीवर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन करण्यात दीड वर्षापूर्वी आली. ज्योतीदूत, जलदूत, व सावित्रीदूत असे तीन महत्त्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी याची स्थापना करण्यात आली.

अद्याप कोणत्याही प्रकारचे कार्य प्रत्यक्षात सुरू झाले नसल्याचे दिसते. याचे मुख्यालय नागपूर येथे स्थापित करण्यात आले. या संस्थेला पूर्णवेळ अधिकारी नाही. प्रदीप डांगे यांना यांच्याकडे व्यवस्थापक पदाची धुरा देण्यात आली होती. आता त्यांना पदोन्नती मिळाली असून गोंदिया जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत. त्यांच्याकडेच व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे कामाचा व्याप जास्त आहे. त्यामुळे शनिवार, रविवारला ते कार्यालयात येतात. सुटीच्या दिवशीही काम करावे लागत आहे. सुटीच्या दिवशी येत असल्याने सामान्य नागरिकांशी भेट होत नाही. इतर दिवशी ते नसल्याने लोकांना आल्या पावली परत जावे लागते. त्यामुळे योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून नावापुरती संस्था निर्माण केल्याची टीका होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT