most of the school taking student exam even after cancelled by government in nagpur
most of the school taking student exam even after cancelled by government in nagpur 
नागपूर

सरकारने परीक्षा केल्या रद्द, पण शाळा ऐकायला तयार नाहीत; नामांकित शाळांकडून परीक्षा घेणे सुरूच

मंगेश गोमासे

नागपूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पहिली ते अकरावी पर्यंतच्या परीक्षा न घेता पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचे आदेश शाळांना दिले. मात्र, विभागाचा आदेश धुडकावून शाळांद्वारे सर्रासपणे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. 

विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता, त्यांना प्रमोट करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. कोरोनाच्या प्रकोपामुळे मंत्र्यांच्या या निर्णयाचे शिक्षक व पालकांनी स्वागत केले. हाच नियम नववी आणि अकरावीलाही लागू करण्यात आला आहे. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवीत शहरातील काही नामांकित शाळांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे कोरोना परिस्थितीचा फायदा घेत, काही शाळांनी विद्यार्थ्यांना विविध असाईनमेंट देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराने पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. 

शिक्षण विभागाकडेही तक्रार - 
शालेय शिक्षण विभागाद्वारे पहिली ते अकरावीच्या (दहावी वगळून) परीक्षा न घेण्याचे आदेश दिलेत. मात्र, ते आदेश शहरातील बऱ्याच शाळा मानत नसल्याने याबाबत काही पालकांनी शाळांविरोधात तक्रार केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता विभाग त्याबाबत शाळांवर कोणती कारवाई करते, त्याकडे लक्ष लागले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT