nagpur sakal
नागपूर

Nagpur District News : अवैध वाहतुकीला अभय कुणाचे? ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी, पोलिसांची डोळेझाक

प्रवासी मिळविण्याकरिता आणि इतरांच्या आधी नियोजित स्थळी पोहचण्यासाठी ट्रॅव्हल्स चालकांची आपसात स्पर्धा सुरू असते.

सकाळ वृत्तसेवा

भिवापूर- बेकायदेशिररित्या प्रवासी भरून सुसाट धावणाऱ्या ट्रॅव्हल्सविरुद्ध कारवाई होणार का, असा प्रश्न ट्रॅव्हल्समुळे प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांकडून उपस्थित केला जात आहे.नागपूरवरून गडचिरोली, आरमोरी, वडसा, ब्रह्मपुरी, मुल, सिंदेवाही, पवनी, लाखांदूर आदी शहराला जाणाऱ्या बसेस भिवापूर मार्गे धावतात. दररोज ट्रॅव्हल्सच्या शेकडो फेऱ्या या मार्गाने होतात. जिल्हातील इतर मार्गांच्या तुलनेत भिवापूर मार्गे धावणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या अधिक आहे.

प्रवासी मिळविण्याकरिता आणि इतरांच्या आधी नियोजित स्थळी पोहचण्यासाठी ट्रॅव्हल्स चालकांची आपसात स्पर्धा सुरू असते. त्यासाठी ते वाहन सुसाट पळवितात. त्यांच्या या जीवघेण्या स्पर्धेचा फटका ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह रस्त्याने धावणाऱ्या इतर वाहनांनाही बसतो. कित्येकदा अपघात होऊन निरपराधांना जीव गमवावे लागले आहेत. मात्र त्याचा ट्रॅव्हल्सचालकांच्या गतीवर कसलाही परिणाम झालेला नाही.

आजही या मार्गावर ट्रॅव्हल्स सुसाट धावताना दिसतात. प्रवाशांनी कुठेही हात दाखविला की थांबणे, कुठेही प्रवासी उतरविणे, थांबताना मागाहून येत असलेल्या वाहनांचा विचार न करणे, करकचून ब्रेक मारणे असले प्रकार या मार्गावर नित्याचे झाले आहेत. त्यातुनच अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी अशाच एका भरधाव ट्रॅव्हल्सच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे येथील बॉइज हायस्कूलसमोर अपघाताची घटना घडली. त्यात दुचाकी चालक युवकाचा हकनाक बळी गेला. विशेष म्हणजे अपघातास ट्रॅव्हल्स चालक कारणीभूत असतानाही पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कसलीही कारवाई केली नसल्याचे बोलले जात आहे.

‘अर्थपूर्ण’ प्रवास?

नागपूर-भिवापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ट्रॅव्हल्स धावत असताना आरटीओ, महामार्ग पोलिस व वाहतूक शाखेकडून कारवाई होताना दिसत नाही. त्याकरिता ट्रॅव्हल्स मालक आणि अधिकारी यांच्यातील ‘अर्थपूर्ण’ प्रवास कारणीभूत असल्याची ओरड प्रवासी करतात.

नियमांची पायमल्ली

ट्रॅव्हल्समधून प्रवासी वाहून नेण्यासाठी परिवहन विभागाकडून आवश्यक कागदपत्रे सादर करून रितसर परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी आवश्यक कराचा भरणाही करावा लागतो. त्यातही ज्या नियोजित स्थळाची परवानगी घेतली जाते तिथेच प्रवासी उतरवावे व बसवावे लागतात. मात्र या मार्गावरून धावणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांकडे परिवहन विभागाची कोणतीही परवानगी नसते. शिवाय त्यांच्याकडून ठिकठिकाणी बस थांबवून प्रवासी बसविले व उतरविले जातात. याचा त्रास लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोसावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RJD Candidate Arrested : उमेदवारी अर्ज दाखल करताच 'राजद'च्या उमेदवारास झारखंड पोलिसांनी केली अटक!

Deglur Accident : बस व ट्रॅव्हल्स समोरासमोर अपघात २८ जण गंभीर जखमी, लेंडी पुला जवळील घटना; २ तास वाहतूक खोळंबंली

'२०२७ वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर आगरकर - गंभीरला पदावरून हटवा!', Navjot Singh Sidhu खरंच असं म्हणाले? स्वत:च केला खुलासा

Diwali Celebration : ऑपरेशन पहाट; सोलापूर पोलिसांनी पारधी कुटुंबांसोबत साजरी केली दीपावली, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Actor Asrani Passes Away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT