Nagpur Murder news man killed by 5 people in nagpur city on sunday  Sakal
नागपूर

Nagpur Murder : नागपूरात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एकाची भरदिवसा हत्या, कारण…

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील नागपूर शहरात रविवारी एका दुकानासमोर भरदीवसा एका व्यक्तीची पाच जणांनी हत्या केल्याचा आरोप आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मृताचे या लोकांशी भांडण झाले होते.

राजेश मेश्राम (23) असे मृताचे नाव असून शनिवारी सायंकाळी समता नगर भागातील एका बिअर बारमध्ये मयत आणि पाच आरोपींमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, राजेशचा बदला घेण्यासाठी पाच जणांनी कट रचला आणि रविवारी सकाळी 10 वाजता कमल चौराहा येथील पान दुकानासमोर त्याला थांबवले आणि आरोपींनी राजेशचा भरदिवसा भोसकून खून केला.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही हत्येच्या आरोपाखाली चार जणांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे. या गुन्ह्यात त्यांनी वापरलेली कार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, मृताच्या नावावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT