Prakash Ambedkar on RSS Sakal
नागपूर

Prakash Ambedkar on RSS: 'हुकूमशाहीमुळे हिंदू धोक्यात', प्रकाश आंबेडकर यांचा भाजप अन् आरएसएसवर हल्ला

आम्ही सांगू तसे वागा, अन्यथा तुम्हाला नेस्तनाबूत करू, अशा हिटलरशाहीमुळे अनेक हिंदूंनी देश सोडला,’’ असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

सकाळ डिजिटल टीम

Prakash Ambedkar criticized Government: ‘‘आम्ही हिंदूंचे प्रतिनिधित्व करतो. हे राष्ट्र हिंदूंचे आहे म्हणणाऱ्या भाजप आणि ‘आरएसएस’च्या सध्या सुरू असलेल्या हुकूमशाहीने हिंदू धोक्यात आले आहेत.

आम्ही सांगू तसे वागा, अन्यथा तुम्हाला नेस्तनाबूत करू, अशा हिटलरशाहीमुळे अनेक हिंदूंनी देश सोडला,’’ असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

भाजप, आरएसएसकडून हिंदू जनता असलेल्या हिंदू राष्ट्रात धार्मिक राजकारण करण्याची गरज काय, याचा खुलासाही होत नाही. सत्ताधाऱ्यांच्या काळाच तब्बल २४ लाख हिंदू कुटुंब देश सोडून गेली आहेत. देश सोडून गेलेल्या प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न साधारणतः ५० कोटींच्या घरात होते. आम्ही सांगतो तसे वागा, असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आल्याने त्यांनी देश सोडल्याचा आरोप अॅड. आंबेडकर यांनी केला. (Latest Marathi News)

या हुकूमशाहीमुळे संविधान धोक्यात आले आहे. त्यांच्याकडून संविधानात बदल झाल्यास ते कसे असतील, याचा विचार होणे गरजेचे आहे. अशा हुकूमशाही राजकारणाला सर्वसामान्य जनतेकडून विरोध होणार आहे. याची कल्पना त्यांना आल्याने त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या भीतीपोटी लोकसभा निवडणुकीत ४०० जागांवर विजय मिळविण्याच्या बाता होत आहेत.

या केवळ फुसक्या बाता असून भाजप १५० जागांच्या वर जाणार नसल्याचेही ते म्हणाले. महाविकास आघाडीतील पक्षांच्या जागा वाटपानंतर आपल्याला आवश्यक असलेल्या जागांची मागणी करू, अशी आपली भूमिका असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का नको, असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

जरांगेंमुळे मोठ्या उलथापालथीची शक्यता

सध्या मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. या आरक्षणाच्या मागणीकरिता विशेष अधिवेशन होणार आहे. यात जरांगेच्या मागण्या मान्य झाल्या तर राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अशात त्यांना कोणताही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशा घटना घडल्या आहेत. यामुळे शासकीय सुरक्षा यंत्रणेने त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT