नागपुरी संत्रा
नागपुरी संत्रा sakal
नागपूर

नागपूर : नरखेडात संत्रा, मोसंबी प्रक्रिया प्रकल्पाची वाणवा

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि. नागपूर) : जिल्ह्यातील नरखेड तालुका संत्रा उत्पादकांचा तालुका म्हणून सुप्रसिद्ध आहे. आशीया खंडातील सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ म्हणून नरखेड तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात ११ हजार हेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे तर ५ हजार हेक्टरमध्ये मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. परंतु तालुक्यात कुठेच कोल्डस्टोरेज व वेअर हाऊस सुविधा नाही, तसेच संत्रा व मोसंबीवर प्रक्रिया करणाऱ्या केंद्राची वाणवा असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा माल मिळेल त्या भावात म्हणजे कवडीमोल भावात विकावा लागतो.

शेतकरी मोसंबी व संत्र्याचे आंबिया व मृग अशी दोन बहरातील पीक घेतात. सद्या आंबिया बहारातील संत्रा व मोसंबी उत्पादनाला सुरुवात झाली आहे. परंतु बाजारपेठेत मोसंबी व संत्र्याला भाव नाही. तरी त्यांना हे फळ पीक ठेवण्यासाठी कोल्डस्ट्रोजची सोया नसल्याने कमी भावात माल विकावा लागत आहे. ज्या क्षेत्रात मोसंबी व संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, त्या क्षेत्रात एकही संत्रा व मोसंबी प्रक्रिया प्रकल्प नाही, ही शोकांतिका आहे.

अतिपावसामुळे संत्र्यावर ‘ब्राऊन रॉट’ रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबी पिकांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे मोसंबी व संत्र्यांवर बुरशी आल्याने संत्रे मोठ्या प्रमाणात झाडांवरून पडली. परंतु या काही प्रमाणातही संत्रा व मोसंबी झाडांवर जिवंत राहिली.

परंतु या उरलेल्या मोसंबी व संत्र्यांच्या कमी किंमतीमुळे संत्रा व मोसंबी उत्पादक अडचणीत आला आहे, अशा परिस्थितीत शेतकरी खर्च भागवू शकत नाहीत. यामुळे आतातरी शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून नरखेड तालुक्यात कोल्डस्ट्रोज व संत्रा व मोसंबीवर प्रक्रिया करणारे केंद्र उभारावे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा माल जेव्हा चांगला भाव मिळेल, तेव्हा विकता येईल व दोन पैसे त्याच्या हातात जास्त येईल, अशी मागणी आता संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी करीत आहे.

"शासन मागील अनेक वर्षापासून प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण प्रत्यक्षात संत्रा उत्पादक भागात प्रकल्प नसल्याने शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी समोर येत नाबार्डद्वारे सबसीडीचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन या तिन्ही गोष्टी करणे गरजेचे आहे. माझे संपूर्ण सहकार्य नाबार्डच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात राहिल."

- कृपाल तुमाने, खासदार

"मागील २५ वर्षांपासून स्थानिक आमदार मंत्री होते, पण मतदारसंघातील संत्रा उत्पादकांच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष नव्हते. परिणामी नरखेड तालुक्यात संत्रा उत्पादनासबंधी कोणतीही सोयीसुविधा उपलब्ध झाली नाही."

- उकेश चव्हाण, उपाध्यक्ष, भाजप, नागपूर

"निवडणूका आल्या की फक्त शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करून अश्वासने देऊन मते मागितली जाते. पण निवडणुका झाल्या की शेतकऱ्यांचा विसर पडत असतो. त्यामुळेच आम्हा शेतकऱ्यांचे हे हाल आहेत."

- सुधाकर बढिये, शेतकरी, जलालखेडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT