nana patole says mahayuti govt last session farmers did not get any help from govt politics Esakal
नागपूर

Nana Patole : महायुतीचे शेवटचे अधिवेशन, पूरग्रस्त नागपूरकरांना अद्याप मदत नाही - नाना पटोले

उपमुख्यमंत्री नागपूरचे असतानाही कोणालाही मदत देण्यात आलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : पूर येवो अथवा शेतकरी आत्महत्या करो. महायुती सरकारला काहीही देणेघेणे नसून या सरकारचे नागपूरचे अधिवेशन शेवटचे ठरणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे महायुतीचे नेते वारंवार सांगतात. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही होत नाही. नागपूरला मोठा पूर आला. हजारो घरांमध्ये पाणी शिरले. लाखोंचे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री नागपूरचे असतानाही कोणालाही मदत देण्यात आलेली नाही.

रोजगार देण्याच्या नुसत्या बाता केल्या जात आहेत. नागपूरमधील मिहानचा फक्त डोलारा उभा आहे. कोट्यवधीचे एमओयू केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर एकाही कंपनीचे काम सुरू होत नाही. हजारो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले जात आहे.

युवकांना रोजगार मिळत नाही. मात्र सरकारच्या बगलबच्चांना काम मिळते असा आरोप नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना पटोले यांनी केला.

ही सरकारची हिटलरशाहीच

मागासवर्गीय आयोग हा संवैधानिक आहे. त्याला संविधानाच्या चाकोरीतून जावे लागते. मग सरकार जर खोटे प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव आणत असेल तर ते तसे करू शकत नाही म्हणून दोन सदस्यांनी राजीनामा दिला असावा.

मागासवर्गीय आयोगाचे सदस्य जर राजीनामा देत असेल तर या सरकारची ती हिटलरशाही आहे. हे सरकार दोन जातीमध्ये वाद निर्माण करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारने लावलेला हा वनवा आहे. यांना ओबीसी किंवा मराठा यांच्याशी देणे घेणे नाही. फक्त वाद निर्माण करून राज्य बरबाद करायचे असल्याचे पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT