Leopard Sakal
नागपूर

Nagpur : बिबट्याला लागले वेड ‘चांदणीबर्डी’चे

गेल्या एक वर्षांपासून या भागात वावर, वन विभागाचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांमध्ये दहशत

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील चांदणीबर्डी शिवारात गेल्या एक वर्षापासून बिबट्याचा वावर असून शेतकऱ्यानंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतीवर जाण्याची भीती शेतकरी व शेतमजूर यात पसरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एकीकडे ओल्या दुष्काळी परिस्थितीतून कसे बसे सावरत शेतकरी आता कुठे रब्बीच्या तयारीत लागला आहे. अशात या संकटाने तो त्रस्त झाला आहे.

गुरूवारी (ता.६) रात्री चांदणीबर्डी येथे रात्री एक च्या सुमारास कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता. शंकर टेकाडे यांचे घर गावाच्या सुरूवातीला आहे. त्यांची सर्व जनावरे घराबाहेर बांधलेली असतात. कुत्र्यांचा जोराचा भूकण्याचा आवाज येत असल्याने शंकर यांनी खिडकीतून बघितले तर बिबट बाहेर बांधलेल्या वासराजवळ येत होता. ते पाहून शंकरने लगेच आरडाओरड केली असता बिबट तेथून पळून गेला.

शंकरच्या ओरडण्याचा आवाज येऊन आजूबाजूने लोक घराबाहेर आले. शंकरने त्यांना झालेला प्रकार सांगितला. सर्व नागरिक रात्रभर तिथे कचरा पेटून जागे राहले. या भागातील नागरिकांना गेल्या एक वर्षांपासून बिबट दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी बिबट्याने तीन कुत्र्यांची शिकार केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे.

आता तर चक्क बिबट्याने गावात प्रवेश केल्यामुळे गावामध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे करायची कशी, रात्रीच्या वेळेस महत्त्वाचे काम आल्याने घराबाहेर जायचे कसे, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. बिबट या भागात असल्याबाबतची माहिती कितेकदा वनविभाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात आली.

परंतु कसल्याही उपाययोजना वन विभागामार्फत आजपर्यंत करण्यात आल्या नाही. हा भाग जंगली असल्यामुळे बिबटचा वावर या भागात आल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले तसेच रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडू नये, शेतात एकटे न जाता गृपने जावे, जनावरे बाहेर बांधू नये अशा सूचना यापूर्वी वन विभागाकडून गावकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

जीव घेतल्यावर येईल का जाग?

बिबट दिसला की काही दिवस वन विभागाचे कर्मचारी त्या भागात रात्रीच्या वेळेस गस्त घालतात व थोडे दिवस झाले की बंद करतात. परंतु कायमची उपाययोजना करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या शेतकऱ्याचा किंवा गावकऱ्यांचा बिबट्याने जीव घेतल्यावर वन विभागाला जाग येईल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. आता तर बिबट्याने चक्क गावात प्रवेश करायला सुरवात केली आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्रीला झालाय असाध्य आजार; मुलाने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Yogeshwar Dutt : "ऑलिंपिक पदक हवे असेल तर मॅटवर उतरा!"; योगेश्वर दत्त यांचा महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंना मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT