Nana Patole  Esakal
नागपूर

Nana Patole : पनोतीवरून भाजप कार्यकर्त्यांचा गैरसमज! सरकारने ओबीसी व मराठ्यांमध्ये भांडण लावल्याचा नाना पटोले यांचं दावा

ओबीसी आणि मराठा समाजात राज्य सरकारने भांडण लावले आहे आहे. ते आता टोकाला गेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - ओबीसी आणि मराठा समाजात राज्य सरकारने भांडण लावले आहे आहे. ते आता टोकाला गेले असून आरक्षणावरून सुरू असलेला धुमाकूळ थांबवण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

जरांगे आणि भुजबळ काय म्हणतात त्यावर आम्हाला बोलायचे नाही. दोन्ही समाजाला न्याय कसा देता येईल हे सरकारने ठरवावे. दोघांचे भांडण आता वैयक्तिक स्तरावर आले आहे. एकमेकांचा समाजवर टीकाटीपणी केली जात आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगली बाब नाही. कोणी सरकार पुरस्कृत बोलत असेल तर ते चुकीचे आहे. याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट व सुसंगत आहे.

काँग्रेसने सत्तेवर आल्यास जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व समाजाला न्याय मिळेल. लोकसंख्येनुसार ओबीसींच्या आरक्षणात वाढ होईल आणि मराठा समाजाचा प्रश्नही सुटेल असाही दावा पटोले यांनी केला.

पनोतीवरून गैरसमज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्तीशाली नेते आहे. मात्र पनोती हा शब्द त्यांनी स्वतःला का लावून घेतला हे समजत नाही. त्यामुळे पनोती शब्द ट्रेडिंग झाला आहे. सर्वसामान्य लोक त्याचा वापर करीत आहे. काँग्रेसने मोदी यांच्याबद्धल हा शब्द वापरला नाही. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनीच तसा समज करून घेतला असेही पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Double Killed Hupari : धक्कादायक! हुपरीत काळजाला चटका लावणारी घटना; मुलानेच वृद्ध आई-वडिलांचा केला निर्घृण खून

Kolhapur Election : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची कसोटी; नेत्यांपेक्षा मतदारांना वश करण्यासाठी स्पर्धा; कार्यकर्त्यांची ताकदच विजयाला पडते उपयोगी

Ahilyanagar Crime: रुईछत्तीशी येथे हॉटेलमधून बांगलादेशी तरुणी ताब्यात; मुंबई पोलिसांची अहिल्यानगरमध्ये कारवाई, धक्कादायक माहिती समाेर..

'...तर कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांना होणार सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास', काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय; श्वसन विकारांचा धोका वाढल्यामुळे सतर्क

Fake RTO Website: अवघ्या सात रुपयांमध्ये डुप्लिकेट आरसी बुक! आरटीओच्या बनावट वेबसाइट प्रकरणातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT