over 19 thousand farmers trapped in crop insurance policy agriculture nagpur Sakal
नागपूर

Crop Insurance : १९ हजार शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांचा ठेंगा; खरीप,रब्बी हंगामातील विमा कागदावरच

शासनाने एक रुपयांमध्ये शेतकऱ्‍यांना पंतप्रधान पीकविमा योजना देण्याचे जाहीर केले.

अशोक डाहाके

केळवद : निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे म्हणून पीकविमा काढले जातो. मात्र,सावनेर तालुक्यातील १९ हजार ३३८ शेतकरी यापासून वंचित राहीले. तर शासन आणि पीकविम्या कंपन्यांना वारंवार विचारणा करूनही त्यांनी निराशा केली. यावर्षीचा खरीप व रब्बी हंगामातील विमा कागदावरच दिसून येतो.

शासनाने एक रुपयांमध्ये शेतकऱ्‍यांना पंतप्रधान पीकविमा योजना देण्याचे जाहीर केले. तसेच नोंदणीदेखील केली. तसेच शेतकऱ्‍यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस कीटकांचा प्रार्दुभाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्‍यांच्या तोंडाशी घास हिरावला गेला. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

पीकविमा काढल्यामुळे त्यांची मदत होईल, अशी अपेक्षा असताना सावनेर तालुक्यातील १९ हजार ३३८ शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत. तालुक्यातील २१ हजार ८६६ शेतकऱ्‍यांनी खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा काढला.

त्यातील तक्रार दाखल केवळ २ हजार ५२८ शेतकऱ्‍यांना पीकविम्याचा लाभ मिळाला. हे प्रमाण अत्यल्प असून तालुक्यात पीक कापणीचा अहवाल चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अस्मानी संकटे झेलणाऱ्‍या बळीराजावर संकटांची मालिका थांबता- थांबत नाही. खरीप व रब्बी हंगामात काढलेला पीकविमा अद्यापही मिळाला नाही. पुढील महिन्यात परत शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होईल. पीकविमा देणार तरी कधी असा प्रश्न पडला आहे.

या पिकांसाठी विमा संरक्षण

खरीप हंगामातील ज्वारी, मुंग, उडीद, तूर, कपाशी, मक्का, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन तर रब्बी हंगामातील गहु, हरभरा, कांदा, उन्हाळी भुईमूग या पिकांना पीकविम्याचे संरक्षण आहे.

केवळ अडीच हजार शेतकऱ्यांना लाभ

सावनेर तालुक्यात खरीप व रब्बी हंगामातील २१ हजार ८६६ इत्यादी शेतकऱ्‍यांनी पीकविमा काढला. यापैकी तक्रारदार २ हजार ५२८ शेतकऱ्‍यांना पीकविम्याचा लाभ मिळाला. तर सोयाबीन उत्पादक ६९८ शेतकऱ्‍यांना सरसकट पीकविमा मिळाला. तालुक्यातील १९ हजार ३३८ शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही.

विमा कंपनीकडून आश्वासनाची खैरात

तालुक्यातील पीकविम्याच्या लाभापासून वंचित असणाऱ्‍या शेतकऱ्‍यांना पीकविमा कधी मिळणार याबाबत विचारणा केली. तेव्हा विम्याचा लाभ मिळेल, असे आश्वासन विमा कंपनीचे अधिकारी देऊन मोकळे होतात.मात्र विम्याचा लाभ देण्यात ते अपयशी ठरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Farmer News : लातूरमध्ये संतापजनक प्रकार! बैलजोडी खरेदी करून गावाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर गुन्हा; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात अडवलं अन्...

Vidarbha Heatwave Update : विदर्भात उष्णतेचा कहर! पारा थेट ४६.६ अंशांवर; 'या' दोन जिल्ह्यांत विक्रमी तापमान, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी...

Shiv Sena Leader Attack : परळीत हॉटेलमध्ये घुसून शिवसेना नेत्यावर धारदार शस्त्राने सपासप वार; सोडवायला आलेल्या पत्नीलाही मारहाण, हाताची तुटली बोटं

Virat Kohli Scripts History! विराट कोहलीचे दोन वर्ल्ड रेकॉर्ड! IPL मध्ये असे पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज...

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT