child died child died
नागपूर

मांजरीने घेतला जीव! कीटकनाशक चाटल्याने चिमुकल्याचा मृत्यू

खेळता खेळता रियांशने जमिनीवर पडलेले विष चाटल्याने त्याची प्रकृती बिघडली

अनिल कांबळे

नागपूर : भिंतीवरील कीटकनाशकाचा डब्बा मांजरीने खाली पाडल्यानंतर घरात सांडलेले कीटकनाशक दीड वर्षाच्या चिमुकल्याने चाटले. त्यामुळे चिमुकला बेशुद्ध पडला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी उघडकीस आली. रियांश ऊर्फ मुन्ना अजय पाटील (रा. समतानगर, मलका कॉलनी) असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पाटील हे शेतकरी असून, दोन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला. त्यांना रियांश नावाचा दीड वर्षाच एकुलता एक मुलगा आहे. अजय यांनी शेतात फवारणी करण्यासाठी कीटकनाशकाचा डबा घरात आणून ठेवला होता. घटनेच्या वेळी रियांश हा घरात खेळत होता. त्याचवेळी मांजरीने पाटीवर ठेवलेला कीटकनाशकाचा डबा पाडला. त्यामुळे जमिनीवर विष सांडले.

खेळता खेळता रियांशने जमिनीवर पडलेले विष चाटल्याने त्याची प्रकृती बिघडली. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचाराचा खर्च वारेमाप सांगितल्यामुळे आर्थिक स्थितीने खचलेल्या अजय यांनी मेयोत दाखल केले. मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Independence Day 2026: ७९वा की ८०वा? यावर्षी भारत कितवा स्वातंत्र्यदिन साजरा करणार?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आण्णासाहेब डांगेंचा सत्कार सोहळा संपन्न

Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

SCROLL FOR NEXT