Raju's murder as opposed to paying ransom 
नागपूर

खंडणी देण्यास विरोध केला म्हणून झाला "त्याचा' गेम

सकाळ वृत्तसेवा

टेकाडी (जि. नागपूर) : सोमवारी कांद्री येथे राजू कश्‍यप या 35 वर्षीय युवकाचा सात जणांनी मिळून खून केला. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. आणखी चार आरोपी पसार आहेत. पैशाच्या देवाणघेवाणीवरून ही हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज होता. परंतु खंडणी मागितली अन्‌ ती देण्यास विरोध केला म्हणून राजू कश्‍यप या युवकाची हत्या झाल्याच्या सध्या परिसरात चर्चा आहे.


कांद्री येथील राजू कश्‍यप या 35 वर्षीय युवकाचा आरोपी बीरेंद्र जगतपाल चौहान आणि प्रदीप ठाकूर यांनी सोमवारी खून केला. पारशिवनी येथून स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारच्या रात्री आरोपींना अटक केली. गुन्ह्यातील आरोपी वीरेंद्र कल्लू नायक याला तत्काळ अटक केल्यानंतर सात आरोपींची नावे पुढे आली होती. सध्या हत्याकांडातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर चार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. पैशांच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज जरी असला तरी प्रकरण मात्र काही "और'च असल्याची चर्चा आहे.


आरोपी बिरेंद्र चौहान आपल्या गॅंगमधील सहकाऱ्यांच्या मदतीने परिसरातील अवैध व्यवसाय आणि व्यवसायिकांना धमकवून खंडणी गोळा करायचा. सोबतच टेकाडी कांद्री परिसरात आरोपी बिरेंद्र चौहान याच्या भावाचा जुगारअड्डयाचा अवैध व्यवसाय असल्याची चर्चा आहे. अशातच राजू कश्‍यप वेकोलिअंतर्गत खासगी कंत्राट कंपनीत सुपरवायजर म्हणून कामाला होता. कंपनीकडे आरोपी बिरेंद्र चौहान आणि वीरेंद्र कल्लू नायक खंडणी मागायला गेले असता, राजू कश्‍यप याने त्यांचा विरोध केला.

त्यानंतर आरोपीकडून राजेशला अनेकदा धमकी देण्यात येत होती. आठवडाभरात वाढलेला वाद विकोपाला गेला आणि सोमवार रात्री कामावरून परत येताना कांद्री शिवारात असलेल्या इंडियन बॅंक ऑफ इंडियानजीक राजू कश्‍यपला सात आरोपींनी घेराव करून चाकूचे वार करून ठार केले. राजेशसोबत असलेल्या मित्राला जखमी करून पसार झाले होते. घटनेच्या काही तासांतच आरोपी बीरेंद्र जगतपाल चौहान, वीरेंद्र कल्लू नायक, प्रदीप ठाकूर यांना अटक केली.

घटनेतील मुख्य आरोपीचा भाऊ रघवेंद्र जगतपाल चौहान आणि सूरज चौहान पसार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून शोध सुरू आहे. बुधवारी अटकेतील आरोपी बिरेंद्र चौहान व वीरेंद्र नायक याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची कोठडी देण्यात आली.

अवैध धंदे सुरूच


हत्या करून सातही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असले तरी दोन एक तास आरोपींनी परिसर सोडला नव्हता. घटनेनंतर मुख्य आरोपी बिरेंद्र चौहान याने गोंडेगाव शिवारातील अवैध कोळसा टाल आणि खदान परिसरातील अवैध जुगारअड्डयावर जाऊन खंडणी मागितली आणि पारशिवनी येथे जाऊन लपला होता. दुसरा आरोपी रघवेंद्र जगतपाल चौहान घटनेनंतर तासभर कन्हान तारसा चौक परिसरात असल्याचे पोलिस तपासांत पुढे आले. सध्या पोलिसांनी आरोपी रघवेंद्र याच्या तांत्रिक पद्धतीने शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : आमची लढाई कोणत्याही नेत्याविरोधात नाही, आम्हाला कोणालाही टार्गेट करायचं नाही: विनोद पाटील

Physiotherapy: आता फिजिओथेरपी फक्त उपचारांपर्यंतीच मर्यादित नाही! फिटनेस अन् दीर्घकालीन आरोग्यासाठीही ठरतेय महत्त्वाची

ENG vs PAK: निर्लज्ज कुठला! इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव अन् रिझवान दात काढत होता... नेटिझन्सन खळवले; Viral Video

ऑपरेशनसाठी १४ वर्षे प्रतीक्षेत, AIIMSमध्ये नंबर येण्याआधी १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांचा मृतदेह घेण्यास नकार

Managutti Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याचे प्रकरण! महत्त्वाचा साक्षीदारच गैरहजर; पोलिस उपनिरीक्षकाविरोधात वॉरंट जारी

SCROLL FOR NEXT