RSS Chief Mohan Bhagwat esakal
नागपूर

Nagpur : प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या, आता जातीभेद संपायलाच हवा; मोहन भागवतांचं मोठं विधान

'पूर्वी झालेल्या त्या चुका मान्य करायला हरकत नसावी. प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

'पूर्वी झालेल्या त्या चुका मान्य करायला हरकत नसावी. प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या आहेत.'

नागपूर : आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी जातिव्यवस्थेवर मोठं भाष्य केलंय. वर्ण आणि जातिव्यवस्था या भूतकाळातील गोष्टी आहेत आणि त्या विसरल्या पाहिजेत, असं भागवतांनी म्हटलंय.

शुक्रवारी नागपुरात (Nagpur) एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवत म्हणाले, 'जातिव्यवस्थेला आता काही महत्त्व राहिलं नाही. वर्ण, जात या संकल्पना पूर्णपणे सोडून दिल्या पाहिजेत.' डॉ. मदन कुलकर्णी आणि डॉ. रेणुका बोकारे यांनी लिहिलेल्या 'वज्रसूची तुंक' या पुस्तकाचा दाखला देत संघप्रमुख भागवत पुढं म्हणाले, सामाजिक समता हा भारतीय परंपरेचा एक भाग होता; पण आता तो विसरला गेलाय. मात्र, त्याचे घातक परिणाम आपल्याला पहायला मिळत आहेत. मागच्या पिढ्यांनी सर्वत्र चुका केल्या आहेत आणि भारतही त्याला अपवाद नाही, असंही ते म्हणाले.

पूर्वी झालेल्या त्या चुका मान्य करायला हरकत नसावी. प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या आहेत. त्यामुळं वर्ण आणि जातिव्यवस्था या भूतकाळातील गोष्टी आहेत आणि त्या विसरायलाच हव्यात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आरएसएसच्या मुख्यालयात विजयादशमीच्या निमित्तानं भागवत म्हणाले होते की, 'आपल्या मित्रांमध्ये सर्व जाती आणि आर्थिक गटांचे लोक असावेत, जेणेकरून समाजात अधिक समानता आणता येईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT