second phase of filling the eleventh class admission form Wednesday 
नागपूर

मोठी बातमी : अकरावी प्रवेश अर्ज भरण्याचा दुसरा टप्पा या तारखेपासून  

मंगेश गोमासे

नागपूर :  अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा उत्तम सहभाग मिळत असून, आतापर्यंत एकूण 3५ हजार 9११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 2३ हजार १७५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा प्रथम भाग भरला आहे. यानुसार बुधवारपासून (ता. १२) अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येईल. २३ ऑगस्टला प्रवेशाची तात्पूरती यादी तर ३० ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाईल.

शिक्षण संचालनालयातर्फे पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन माध्यमाने राबविण्यात येत आहे. गेल्यावर्षी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत 21 हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. 190 महाविद्यालयात कला, विद्यान, वाणिज्य आणि एमसिव्हीसीच्या 58 हजार 240 जागा होत्या. यांपैकी तीन प्रवेश फेरीत 22 हजार 501 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविला होता. 35 हजार 741 जागा रिक्त राहिल्या होत्या. 

59 हजार 40 जागांचा समावेश


यानंतर विशेष फेरी राबवीत शेवटी 21 हजार 282 जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे बऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइनऐवजी ऑफलाइन प्रवेशाची मागणी केली होती. मात्र, सरकारने त्यांची मागणी अमान्य करीत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. प्रक्रियेत शहरातील 216 कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग असून त्यात 59 हजार 40 जागांचा समावेश आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

2३ हजार १७५ विद्यार्थ्यांनी भरले अर्ज 


यानुसार 3५ हजार 9११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 2३ हजार १७५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा प्रथम भाग भरला आहे. नोंदणी नियमित सुरू असून यादरम्यान २३ ऑगस्टला प्रवेशाची तात्पूरती गुणवत्ता यादी प्रकाशित केल्या जाईल. यावर २५ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार आहे. ३० ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित केल्या जाईल. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नोंदविता येणार आहे.
 
अशा आहे तारखा

  • १२ ते २२ ऑगस्ट- अर्जाचा दुसरा भाग भरणे.
  • २३ ते २५ ऑगस्ट - तात्पूरती गुणवत्ता यादी व आक्षेप नोंदविणे.
  • ३० ऑगस्ट - अंतिम गुणवत्ता यादी.
  • ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर - विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नोंदविणे. 

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT