Abhay Karandikar News sakal
नागपूर

Abhay Karandikar News : संशोधन क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याची गरज - प्रा. अभय करंदीकर

विज्ञान भारतीच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्‍घाटन शिक्षण व संशोधन क्षेत्रासाठीची गुंतवणूक आणखी वाढविण्याची गरज आहे, असे मत केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीचे फायदे अधिकाधिक समाज घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. देश म्हणून स्टार्टअप्समध्ये मोठी मजल मारली असली, तरी बौद्धिक संपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात आपण पुरेसे गंभीर नाही.

शिक्षण व संशोधन क्षेत्रासाठीची गुंतवणूक आणखी वाढविण्याची गरज आहे, असे मत केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी व्यक्त केले.

लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठात आयोजित विज्ञान भारतीच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्‍घाटन प्रसंगी प्रा. करंदीकर बोलत होते.

याप्रसंगी ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर, विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. शेखर मांडे, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, ‘एमआयटी’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे प्रमुख डॉ. मंगेश कराड आदी उपस्थित होते.

यावेळी अधिवेशनाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘विज्ञान भारतीने सातत्याने समाजात वैज्ञानिक संस्कार रुजवण्याचे कार्य केले आहे. प्राचीन भारतीय परंपरेतील ऋषी हे त्या काळातील संशोधकच होते.

आरोग्य, स्थापत्य, वास्तूनिर्माण, प्रशासन, औषधनिर्माण, शल्यचिकित्सा अशा कित्येक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे’’. डॉ. विजय भटकर यांनी ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने आपल्या आचरणात विज्ञाननिष्ठेचा स्वीकार केला, तर आपोआपच तो सार्वत्रिक होईल, असे मत मांडले. डॉ. शेखर मांडे यांनी कोविड काळातील भारताची कामगिरी, चांद्रयान मोहीम आणि अयोध्येतील मंदिर निर्माण यावरील वैज्ञानिक पृष्ठभूमी स्पष्ट केली.

भारताची भूमिका मुळातच ज्ञानमय, विज्ञानमय आहे. सातत्याने विकासाकडे नेणारी अध्यात्मयात्रेची वैज्ञानिक प्रयोगशाळाच जणू आपल्या ऋषींनी, तत्त्वज्ञांनी आणि संतांनी शतकानुशतके उभारलेली आहे,

जी विश्वकल्याणाचा संदेश देत सदैव पुढे जात राहील, असे मत डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केले. डॉ. कौस्तुभ साखरे यांनी आभार आणि डॉ. तृप्ता ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. विवेकानंद यांनी संस्थेचा अहवाल सादर केला.

सुरेश सोनी यांचे बीजभाषण

‘समग्र विकासाची भारतीय संकल्पना व विज्ञान भारतीची भूमिका’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत सुरेश सोनी यांचे बीजभाषण झाले. ‘विकासाची संकल्पना अधिकाधिक अर्थपूर्ण करण्यासाठी जुनी व कालबाह्य प्रतिमाने टाकून दिली पाहिजेत.

विज्ञान, तंत्रज्ञानाचे विवेकपूर्ण साह्य घेत, विश्वकल्याणाचा संदेश देणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाचा अंगीकार केला, तरच जागतिक शांतता आणि सातत्यपूर्ण विकासाचे स्वप्न साकार होईल. विश्वकल्याणाची भावना आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार करण्याची गरज आहे’, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT