nand monsoon not useful farmers agriculture rain forecast nagpur Sakal
विदर्भ

Nagpur Rain Update : पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, दुबार पेरणीची घेतली धास्ती

नांद परिसरात पेरणी १०० टक्के; दुबार पेरणीची घेतली धास्ती

सकाळ वृत्तसेवा

नांद : नांद परिसरातील पेरणी १०० टक्के पूर्ण झाली असून गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नांद परिसरात रोहिणी व मृग नक्षत्र कोरडेच गेले. आद्रा नक्षत्राचा पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने बळीराजा खरिपाच्या हंगामाकरिता जोमाने भिडला. सोयाबीन पेरणी व कापूस लागवड,हळद लागवड,धानाची पऱ्हे टाकणे सुरूवात केली.

त्यानंतर अधूनमधून हलका पाऊस येत असताना शेतकऱ्यांनी आपली शेती सोयाबीन पेरणी,तूर ,हळद व कापूस लागवड ही १०० टक्के केली. शेतकरी करीत आहे.आता पावसाने ८ ते १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

शेतात टाकलेली बियाणे उगवले. मात्र पावसाअभावी ते करपण्याच्या मार्गावर आहेत.पेरणी,लागवड चांगली झाली. हवामान खात्याचा अंदाज चुकत असून हवामान शास्त्रज्ञाला सुद्धा पाऊस हुलकावणी देत आहे.

दोन-तीन दिवसांत पाऊस पडला नाही, तर संपूर्ण पेरणीच वाया जाण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, असे शेतकरी आपल्या शेतातील पिके वाचविण्याची धडपड करीत आहे.

त्यांनी तुषार सिंचन चालू करून पिके वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुळातच ओलिताची सोय खूप कमी शेतकऱ्यांकडे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय असेल तो शेतकरीसुद्धा मोठ्या कालावधीसाठी शेती क्षेत्र ओलिताखाली ठेवू शकत नाही.

वीज आणि पाणीटंचाई या दोन्ही गोष्टींचा सामना त्यांना करावा लागतो. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आता यावर पावसाची तीव्र गरज आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, ते शेतकरीसुद्धा फार क्षेत्र ओलित करू शकत नाही.

त्यांच्या समोरही विविध अडचणी आहेत. येत्या एक-दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. सध्या शेतकरी पीक वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

परंतु, शेवटी पावसाने ओढ दिली, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याचे चिन्ह आहे.

शेतकरी झाले चिंतातूर

शेतकऱ्यांनी कृषी केंद्राच्या दुकानातून बियाणे,रासायनिक खते नेऊन पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. पीक कापूस,तूर लागवड व सोयाबीन पेरणीची घाई करीत सुरुवात केली असली तरी आद्रा नक्षत्राने बळीराजाच्या डोळ्यात पाणीही आणले आहेत. सध्या शेतकरी ८ ते १० दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट बघत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT