विदर्भ

आदिवासी शेतकऱ्याने घडविली जलक्रांती

संजीव बडोले

रामजी कोराम प्रेरणादायी - दुष्काळावर मात; पाच किमीचा तयार केला कालवा

नवेगावबांध - भयावह, भीषण दुष्काळात होरपळून निघालेल्या आदिवासीबहुल खेड्यातील एका आदिवासी शेतकऱ्याने राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध क्षेत्रातील धबधब्यापासून थेट शेतापर्यंत पाट निर्माण करून गावात जलक्रांती घडवून आणली. ४५ वर्षांपूर्वी रामपुरी येथील रामजी कोराम (वय ८५) यांनी हा नवा आदर्श निर्माण केला. राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध क्षेत्रातील धबधब्यापासून थेट पाच किलोमीटरचे अंतर, रेड्यांच्या साह्याने नांगर जुपून तब्बल बारा महिन्यांच्या कालावधीत ही जलक्रांती घडवून आणली होती. 

गरिबी पाचवीला पुजलेल्या घरात रामजीचा जन्म झाला. लहानपणी ते आईवडिलांसह शेतात जायचे. शिक्षणाची कुठलीही सोय नाही. शेतात राबण्याशिवाय पर्याय नाही. वडिलांच्या निधनानंतर तीन भावडांची जबाबदारी रामजींवर आली. जंगलातील कंदमुळे, मोहफुले खाऊन गुजरान चालत होती. मोठे कष्ट उपसूनही हवे तसे उत्पादन मिळत नाही, हे पाहून रामजी अस्वस्थ व्हायचे. शेतीला पाणी न मिळाल्याने शेतात पीक फारसे होत नव्हते. १९७२ मध्ये भीषण दुष्काळ, नुकतेच भारत, पाक, बांगलादेश युद्ध संपलेले होते. त्यामुळे टंचाई आणि महागाई यामुळे दोनवेळच्या जेवणाचीही पंचाईत होती. गावात इतरांच्याही घरची परिस्थिती याहून वेगळी नव्हती. मानवासह प्राण्यांचीही उपासमार होत असल्याचे डोळ्यांदेखत रामजी पाहत होते. 

परिस्थितीशी दोन हात करण्याचा विडा रामजींनी उचलला. काहीही करून शेतात पाणी आणायचेच, या धेय्याने रामजींना पछाडले. आताच्या राष्ट्रीय उद्यानातील राखीव क्षेत्रातील धबधबा, पावसाळ्यात भरपूर पाणी ओसंडून वाहायचे. त्या धबधब्याचे पाणी शेतीकरिता उपयोगात आणायचे हे रामजीने ठरविले. गावातील इतर सोबती सखाराम मडावी, बकाराम मडावी, सनकू भोगारे, नागसी कोराम, सनकू सलामे यांना ही कल्पना सांगितली. त्यांनीही रामजीच्या या धबधब्याचे पाणी शेतीला आणण्याच्या कल्पनेला साथ दिली. नांगराला रेडे जुंपून नाल्यापासून ते शेतापर्यंत छोटा कालवा बनविण्याचे काम सुरू झाले. तब्बल एक वर्षात हे काम पूर्णत्वास आणण्यात आले. रामजी प्रसिद्धीच्या झोतापासून अद्यापही दूरच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fire News: तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT