download D
download D 
विदर्भ

बापरे..! ३,२०० तक्रारी बियाणे उगविले नसल्याच्या!!

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगविल्याच्या चक्क तीन  हजार दोनशे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तक्रारदार शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे  शासनाचे आदेश आहेत. असे असतानाही कंपन्यांकडून बियाणे बदलून देण्याबाबत निर्णय  झालेला नाही. पेरणीचा हंगाम निघून जात असल्याने आता उधारी करून शेतकरी लागवड  करीत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना पेरणीनंतर बियाणे मिळणार असल्याचे चित्र दिसत  आहे.

जिल्ह्यात एक जुलैपर्यंत नऊ लाख हेक्‍टरपैकी जवळपास सात लाख ३२ हजार हेक्‍टर  क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी झालेली आहे. आतापर्यंत ८२ टक्के पेरणी झालेली आहे.  दोन लाख १९ हजार हेक्‍टरवर यंदा सोयाबीनचा पेरा झालेला आहे. त्यातील जवळपास १०  ते १२ टक्के क्षेत्र बियाणे न उगवल्याने दुबार पेरणीच्या छायेत आहे.

दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शासनाने संबंधित बियाणे कंपन्यांनी बियाणे  बदलून देण्याचे आदेश दिलेले आहेत. शासनाची कंपनी असलेल्या महाबीजने शेतकऱ्यांना  बियाणे बदलून देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, खासगी कंपन्यांकडून अजूनही "प्रतिसाद'  दिला जात नाही. त्यामुळेच अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत.

असे असले तरी शेतकऱ्यांचा प्रश्‍न मात्र कायम आहे. बियाणे न उगविल्याबाबत आतापर्यंत  तीन हजार दोनशे शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल केलेल्या आहेत.  मात्र, अजुनही केवळ पंचनाम्याचे सोपस्कार सुरू आहेत. आतापर्यंत केवळ दीड हजार  शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले असून, अजूनही दीड हजार शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

पंचनम्यासाठी किती वेळ लागणार, हे अजूनही अस्पष्ट आहे. बियाण्यांबाबत अजूनही ठोस  धोरण ठरलेले नाही. परिणामी, बियाणे कधी मिळणार, असा प्रश्‍न अडचणीत असलेल्या  शेतकऱ्यांसमोर आहे. पेरणीचे दिवस हातातून जाईल, या भीतीने शेतकऱ्यांनी उधारी करून  किंवा इतर पर्याय वापरून पुन्हा बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे.

पावसाचे दिवस असल्याने पीक उगवले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची आशा आहे. त्यासाठी  नगदी स्वरूपात सोयाबीनचे बियाणे खरेदी केले जात आहे. अनेक तक्रारदार शेतकऱ्यांनी  पेरणी उरकल्याने पुन्हा बियाणे घेऊन त्याच काय करायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला  आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून पेरणी केली, अशा शेतकऱ्यांना  नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

महाबीजकडून बियाणे देण्यास सुरुवात

ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. त्यांच्या तक्रारी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे  आलेल्या आहेत. शेतकऱ्यांची यादी आमच्याकडे आल्यानंतर शेतकऱ्यांना बियाणे बदलून  दिले जात आहे. आतापर्यंत जवळपास १२ हजार क्विंटल बियाणे बदलून देण्यात आले  आहे, अशी माहिती महाबीज कंपनीकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT