नांद : पुरामुळे पुलाच्या कठड्याला कार अडकली 
विदर्भ

संततधार पावसाचा मंगळवार

सकाळ वृत्तसेवा

उमरेड (जि.नागपूर) : गेल्या आठवड्यापासून विदर्भात सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे तालुक्‍यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे. 25 ते 29 जुलैला पडलेल्या पावसाची नोंद अनुक्रमे 56.98 मिमी, 5.25 मिमी, 39.16 मिमी, 19.26 मिमी, 21.33 मिमी नोंद झाली असून 29 जुलैला दुपारी 3 वाजेपर्यंत 54 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली. संततधार पावसामुळे तालुक्‍यातील अनेक गावांमधील नदी, नाले, ओढे यातील पाणीपातळीत वाढ होऊन ते दुथडी वाहू लागलेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन गावांचा उमरेड शहराशी संपर्क तुटला असल्याचे चित्र दिसत आहे. पावसामुळे शेतीकामासोबतच अन्य कामांचाही खोळंबा झाल्याचे दिसते. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेत जाणे अवघड झाले आहे. ग्रामीण भागासोबतच शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील वर्दळीचा चौक असलेला संत संताजी जगनाडे महाराज चौकातसुद्धा दिवसभर शुकशुकाट दिसला. पाऊस जर नियमित सुरूच राहिला तर शेतीला धोका होऊ शकतो, असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. ब्राम्हणी गावालगत असलेल्या उंद्री नदीला पूर आल्यामुळे गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. बुटीबोरी : आज सकाळपासून परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. प्रदीर्घ कालावधीनंतर आलेल्या पावसाने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पावसाचा आनंद लुटण्याकरिता लहान मुले व अनेक नागरिक या पावसात भिजून चिंब झाले. मात्र, शाळकरी विद्यार्थ्यांची चक्क फजिती झाली. शाळा सुटताच त्यांना मुसळधार पावसाचा मारा सहन करावा लागला. पावसाने काही प्रमाणात का होईना उष्णतेच्या लाटेपासून मुक्ती दिली. बळीराजाला या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा नक्कीच मिळेल.  पुरामुळे पुलाच्या कठड्याला कार अडकली असून जीवितहानी झाली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT