File photo 
विदर्भ

महामार्गात गेलेल्या जमिनीला मोबदला देण्यावर स्थगिती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या आर्णी (जि. यवतमाळ) तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर माहूर (जि. नांदेड) येथील दत्त शिखर संस्थानने दावा केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने आर्णी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोबदला देण्यावर स्थगिती आणली.
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आर्णीसह तालुक्‍यातील कोळवण, सुकळी गावातील 6 हजार 403 एकर जमीन निजाम सरकारने त्या काळी त्यांना दिली होती. त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून शेती करण्यास सुरुवात केली. याच जमिनीतून समृद्धी राष्ट्रीय महामार्गसुद्धा गेला आहे. त्याचा मोबदला म्हणून सरकारने दहा ते वीस कोटी रुपयांची रक्कम पारित केली आहे. माहूर येथील दत्त शिखर संस्थानने या जमिनीवर दावा करीत यवतमाळ येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला.
त्यामुळे, देवस्थानने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाने दत्त शिखर संस्थानला एक महिन्याचा कालावधी देत शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यावर स्थगिती आणली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 सप्टेंबरला होणार आहे. उच्च न्यायालयात आर्णी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या बाजूने ऍड. प्रवीण देशमुख यांनी, संस्थानतर्फे ऍड. सुभाष नेमाडे यांनी आणि शासनातर्फे ऍड. कल्याणी देशपांडे यांनी बाजू मांडली. या प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्या समक्ष सुनावणी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने भारताची चिंता वाढली! सेमीफायनलमधील शेवटच्या जागेसाठी न्यूझीलंडशी शर्यत; पाहा समीकरण

INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्ध सामना कुठे फिरला, ज्यामुळे भारताचा झाला ४ धावांनी पराभव, हरमनप्रीत कौरने बोलून दाखवली मनातलं दु:ख

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT