मिरज : ‘‘राज्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन व चोरी रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, गौण खनिज साठ्यांचे दर तीन महिन्यांनी ‘ईटीएस’ प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे,’’ अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मिरज येथे आयोजित महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशन व पुरस्कार वितरण समारंभानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.