Railway ticket booking will remain closed for six hours 
विदर्भ

रेल्वे तिकीट बुकींग राहणार सहा तास बंद

प्रवीण खेते

अकाेला - आयआरसीटीसी ही रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग साईट बुधवारी (ता. 2) रात्री 10.45 वाजतापासून सहा तासांसाठी बंद राहणार आहे. रेल्वेच्या पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टमला (पीआरएस) अद्यावत करण्यात येणार असल्याने हे संकेतस्थळ बंद ठेवण्यात येईल. 

आयआरसीटीसीचे संकेतस्थळ बुधवारी रात्री 10.45 वाजतापासून 3 मे रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत हे संकेतस्थळ बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत रेल्वे तिकीट बुकींग सेवा बंद राहत असल्याने रेल्वे प्रशासनाने ही वेळ निवडली आहे. परंतु, ज्या प्रवाशांना बुकींग केलेले तिकीट रद्द करायचे झाल्यास, ते तिकीट या सहा तासात रद्द हाेऊ शकणार नाही. शिवाय, रेल्वेच्या ऑनलाईन चौकशीशी संबंधित सेवाही या कालावधीत बंद असतील. बहुतांश रेल्वे प्रवाशी हल्ली आॅनलाईन माध्यमातूनच रेल्वेशी निगडीत माहिती मिळवतात. परंतु, या सहा तासांत आॅनलाईन सेवा बंद राहणार असल्याने, अशा रेल्वे प्रवाशांची पंचाईत हाेण्याची शक्यता आहे.

या माध्यमातून मिळवा माहिती  
बुधवारी रात्री 10.45 ते गुरुवारी (ता. 3) पहाटे 5 वाजताच्या कालावधीत तुम्हाला रेल्वेशी संबंधीत कुठलीही माहिती हवी असल्यास, आयव्हीआरएस टच स्क्रीन, कॉल सेंटर आणि रेल्वे फोन नंबर 139 या माध्यमातून घेता येईल. त्यामुळे प्रवाशांना तशी फार अडचण येणार नाही.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

SCROLL FOR NEXT