orange.jpg
orange.jpg 
विदर्भ

संत्र्यानेही दाखविला गुण; शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी

सकाळ वृत्तसेवा

टुनकी (जि.बुलडाणा) : संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी सोनाळा, टुनकी व आजूबाजूच्या परिसरात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. आधीच नैसर्गीक वातावरणामुळे संत्रा बागा चांगल्या प्रमाणात बहारल्या नाहीत. त्यामुळे संत्रा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या संत्रा बागा न बहारल्याने हंगाम पुर्णपणे खाली गेला.

सुरुवातीला संत्रा बाजारात चांगल्या प्रमाणात तेजी होती. मात्र, जसा जशी संत्र्याची आवक बाजारात वाढली त्याप्रमाणे संत्राच्या बाजार भावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे सत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. परतीचा पाऊस लांबणीवर गेल्यामुळे संत्रा बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

फळगळ मोठ्या प्रमाणात
सतत पाऊस पडत राहल्याने मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. रोगाचा पादुर्भाव वाढल्याने किटकनाशकाचा खर्च वाढला. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला संत्रा बाजारात चांगली तेजी होती. सुरुवातीला 600 रुपये कॅरेट पर्यत भाव मिळाले त्यावेळी कच्चा माल असल्याने शेतकरी मालाची विक्री करू शकले नाहीत. मात्र, आता संत्रा फळ पुर्णपणे परिपक्व झाल्यामुळे संत्रा तोडणीचा हंगाम चांगल्या प्रमाणात चालू झाला. परंतु बाजारात संत्राची आवक वाढताच भावात घसरण होऊन 300 ते 350 रुपये कॅरेटचे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामध्ये अवकाळी पावसाचे ढग मोठ्या प्रमाणात येत असल्याने पावसाची आणि गारपिट होण्याच्या भीतीमुळे शेतकरी धास्तावलेला दिसत आहे. 

संत्र्यावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग विदर्भात नाही
दोन वर्षांपूर्वी आलेल्या गारपीटने संपूर्ण संत्रा बागा उद्‍ध्वस्त केल्या होत्या. त्यामुळे तोंडात आलेला घास जाण्याच्या भीतीमुळे नाइलाजास्तव तोडणी करावी लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. संत्र्यावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग विदर्भात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला संत्रा व्यापाऱ्यांना देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावावर समाधान मानावे लागते. यातून संत्रा उत्पादकांची आर्थिक गळचेपी होत आहे. राज्य सरकारने संत्रा उत्पादकांना न्याय देण्यासाठी सर्वप्रथम विदर्भात संत्रा प्रक्रिया उभारणे गरजेचे आहे. राज्यात द्राक्षावर आधारित तब्बल शंभरावर वायनरी आहेत. 

संत्र्यापासूनही होऊ शकते दर्जेदार वाईन
संत्र्यापासूनही दर्जेदार वाईन तयार होऊ शकते. द्राक्षापेक्षा संत्रा स्वस्त असल्यामुळे वाईनही स्वस्त पडेल. वादळ, गारपीट यामुळे खाली पडलेला व व्यापाऱ्यांनी चुरा म्हणून बाजुला फेकलेला संत्राही वायनरीत उपयोगी आणता येतो. या संत्र्यात शुगर 18 टक्क्यांपर्यंत असते. त्यामुळे साखर टाकण्याची गरज पडत नाही. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे संत्रा उत्पादकांचे नुकसानही टळू शकते. पण या दृष्टीने विचार करण्यास सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. द्राक्षासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान देऊन वायनरी उभारल्या जाते तर विदर्भात संत्र्यासाठी वायनरी का उभारली जात नाही, असा सवाल संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी करत आहेत.

मिळेल ‘त्या’ भावात संत्रा विक्री
जानेवारी महिन्यात संत्र्याला चांगले भाव होते. बऱ्याच शेतकऱ्यांनी 600 रुपये कॅरेट पर्यंत सौदे केले. मात्र, आज रोजी बाजार भावात घसरण झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी सौदा सोडले तर काही कमी भाव देऊन संत्रा खरेदी चालु आहे. फळाची परिपक्वता पूर्ण झाल्याने आणि अवकाळी पावसाची भीतीमुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात संत्रा विकल्याशिवाय पर्याय नाही.
-विजय हागे, जिल्हा उपाध्यक्ष भारीप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT