विदर्भ

रोजगारासाठी पुन्हा स्थलांतर; होळी आटोपताच कामाच्या शोधात रवाना

होळीच्या सणामुळे गेल्या १५ दिवसांपासून मेळघाटच्या प्रत्येक गावात आलेली रंगत आता परत एकदा ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

धारणी : होळीच्या सणामुळे गेल्या १५ दिवसांपासून मेळघाटच्या प्रत्येक गावात आलेली रंगत आता परत एकदा ओसरण्यास सुरुवात झाली आहे. रोजगाराच्या शोधात येथील आदिवासी बांधवांचे स्थलांतर सुरू झाले आहे. त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर कधी रोजगाराची हमी दिल्या जाणार, असा सवाल करण्यात येत आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना हे पाऊल उचलावे लागत आहे.

मेळघाटातील नागरिक रोजगारासाठी स्थलांतर करीत असल्याने गावागावातील गल्ल्यांमध्ये पुन्हा शांतता निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. होळीमुळे गावे चकाचक दिसू लागली होती. प्रत्येक गावात तसेच तालुक्यातील बाजारपेठांमध्येही आनंदाचे वातावरण होते, मात्र होळी होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच पुन्हा मजूरवर्गाचे स्थलांतर सुरू झाले आहे, ही चिंतेची बाब आहे.

मेळघाटातून मजूरवर्ग पुणे, अकोला, अकोट, राजस्थान, कर्नाटक, हैदराबाद, परतवाडा, नागपूर येथे रोजगारासाठी जाताना दिसत आहे. कामानिमित्त बाहेर जात असताना अनेक ठिकाणी अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे अनेक मजुरांना आपला जीव गमवावा लागला. तरीही मजूर रोजगारासाठी स्थलांतर करताना दिसत आहेत.

मेळघाटात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये गावातील नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे, मात्र अनेक ठिकाणी कामे नसल्याने ही योजना बंद पडल्याने गावातील नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे. त्यामुळे गावातील रस्ते ओसाड पडलेले दिसत आहेत. रोजगार हमी योजनेत २४८ रुपये प्रतिदिन या दराने रोजगार उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. परंतु वेळेवर रोजगार हमी योजनेचे पैसे मिळत नसल्याने अनेक वेळा लोक या योजनेच्या कामावर जाण्याचे टाळतात व दुसऱ्या शहराकडे स्थलांतर करतात.

रोहयोत शेतीच्या कामांची तरतूद करा

रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीची कामे झाली पाहिजेत, ज्यातून चांगला रोजगार मिळू शकतो. पीकपेरणीपासून ते काढणीपर्यंत, रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराची कामे घेतल्यास स्थलांतराच्या समस्येवर मात करता येते. स्थलांतरामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने प्रचंड त्रास होतो. रोजगार योजनेत शेतीची कामे घेतल्यास शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि गावातील नागरिकांनाही रोजगार मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Nandgaon Municipal Election : ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला कंटाळले; नांदगावकर निवडणुकीच्या प्रतीक्षेत

Pachod News : संजय कोहकडे मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

SCROLL FOR NEXT