मासोद (जि. वर्धा) : मानवी हस्तक्षेप, रहदारीमुळे वन्यप्रण्यांना होणारा त्रास, अवैध शिकार, तथा वनसंपत्तीची चोरी थांबविण्याकरिता वनविभागाने मुख्य रस्त्यावरून जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाकडी अडथळे बसविले आहे.
यामुळे वन्यजिवांचे संरक्षण होणार असल्याने वन्यप्रेमींनी वनविभागाचे कौतुक केले आहे. मात्र, भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाशिवरात्रीला हा रस्ता सुरू ठेवावा, अशी मागणी भाविकांनी वनविभागाकडे केली आहे.
वनविभागाने जंगलात जाणारा मुख्य रस्ता काड्या टाकून बंद केला आहे. याच रस्त्यात ढगा भुवन, वानरकुंड कडे जाणाऱ्या रस्त्याचा समावेश आहे. दिवसेंदिवस वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वन्यप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत होती. त्यातच वनसंपत्तीची चोरी सुरू आहे. यावर प्रतिबंध घालण्याकरिता व जंगल परिसरात कुठलेही वाहन येऊ नये, याकरिता वनविभागाने मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण केला आहे.
हेही वाचा - धक्कादायक! आजीसोबत फिरणाऱ्या चार वर्षीय चिमुकल्याला घेऊन युवक पसार; तब्बल २० तास उलटूनही पत्ता...
मात्र, रस्त्यात अडथळे निर्माण केल्याने चारचाकी आणि दुचाकी वाहने आता देवस्थानपर्यंत नेता येणार नाही. त्यामुळे भाविकांत नाराजी व्यक्त होत आहे. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावाने महाशिवरात्रीची यात्रा भरणे शक्य नाही. परिणामी, भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हा रस्ता मोकळा करावा, अशी मागणी भाविकांनी वनविभागाकडे केली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.