File photo
File photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 कॉंग्रेस उमेदवारांकडे दिग्गजांनी फिरविली पाठ

मनोज भिवगडे

अकोला : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांकडे पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवली आहे. विश्वास गमावून बसलेल्या उमेदवारांना आता प्रचाराच्या अखेरच्या तीन दिवसांत अंतर्गत मतभेद विसरून स्वबळावरच प्रचाराचा शिवधनुष्य पेलावा लागणार आहे.
अकोला जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये 3-2 असे जागावाटप झाले आहे. आघाडीत कॉंग्रेसला तीन जागा मिळूनही मुकुल वासनिक वगळता एकही दिग्गज नेता जिल्ह्यात फिरकला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र जिल्ह्यातील पक्षाच्या दोन्ही उमेदवारांसाठी प्रचाराच्या सुरुवातीच्या काळातच सभा घेतली. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी तर खुद्द पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी

यापूर्वी नेत्यांनी दिला होता इशारा
सन 2014 मध्ये लोकसभा निवडणूक झाल्यानंतर तत्कालीन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित कार्यक्रमात कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना मतभेद विसरून एकत्र काम केले नाही, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. त्यानंतरही कॉंग्रेसचे पदाधिकारी एकमेकांशी सातत्याने वादविवाद करताना दिसत होते. या अंतर्गत वादांमुळे कॉंग्रेसच्या दिग्गजांनी अकोला जिल्ह्याकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा कॉंग्रेसच्या गोटात सुरू आहे.

कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर
कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी पक्ष सोडला. राजेश भारती यांचीही पक्ष सोडण्याची चर्चा जोरात आहे. मदन भरगड आधीच पक्ष सोडून गेले. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात कॉंग्रेसची पाटी कोरी राहिल्यास पक्षात मोठी फूट पडू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT