Prakash Ambedkar 
विदर्भ

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना 'इंडिया' आघाडीत घेण्यासाठी शरद पवारांचा हिरवा झेंडा! म्हणाले...

Sandip Kapde

Prakash Ambedkar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत घेण्याबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच आतापर्यंत प्रकाश आंबेडक यांना इंडिया आघाडीत का घेतलं नाही?, यावर देखील पवारांनी भाष्य केले.

शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. मात्र समान कार्यक्रमावर भाजपविरोधातील ज्या शक्ती एकत्र येऊ शकतील. यामध्ये यापूर्वी काय झालं याचा विचार न करता त्यांना सहभागी करावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे.

मात्र प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. बाकीच्या लोकांना देखील विश्वासात घ्यावे लागेल, असे पवार म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी उशीर का होतोय, यावर शरद पवार म्हणाले, आमची बैठक झाली नाही. इंडियाची बैठक होणार आहे. मुंबईला बैठक झाली त्यानंतर नागपूर किंवा इतर कुठं बैठक होणार, याबाबत आमची चर्चा सुरु आहे.

प्रकाश आंबेडकर आरोप करतात पण ते आमच्यासाठी नवीन नाही. त्यांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडी निर्णय घेईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजार कोसळला! 5 लाख कोटींचे नुकसान; मात्र हा शेअर 13% वाढला

Navi Mumbai: मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार! ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाला सुरूवात, कसा आहे मार्ग?

Vadgaon Sheri News : बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर; वडगाव शेरी आणि विमानतळ परिसरात पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

Agriculture News : तळवडेत कडक उन्हातही बाजरीचे पीक तरारले, शेतकऱ्यांचा वाढता कल; कमी पाणी अन् खर्चही कमी असल्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT