amruta fadanavis
amruta fadanavis 
विदर्भ

अमृता फडणवीसांना आवर घाला, या शिवसेना नेत्याने पाठवले आरएसएसला पत्र

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आवरा अशा आशयाचे पत्र वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना लिहिले आहे.

अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्या सोशल मीडियावरून राजकीय कोटी देखील करत असतात. यामुळे नेटकरी त्यांना चांगलेच फैलावर घेत असतात. 

आपल्या वक्तव्याने अमृता फडणवीस जर असेच संबंध वाईट करत राहिल्या, तर देवेंद्र फडणवीस कसे मुख्यमंत्री होतील? असे तिवारी यांनी पत्रात म्हटले आहे. यासाठी त्यांनी जशोदाबेन, रश्मी ठाकरे, कांचन गडकरी, शर्मिला ठाकरे ह्यांच्या वागण्याचे दाखले देखील दिले आहेत.

अमृता फडणवीसांनी नुकीतीच कोषातल्या रेशीम किड्याशी तुलना करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. अमृता फडणवीसांनी फडणवीसांची बाजू घेण्यासाठी अनेक वेळा शिवसेनेवर टिका केली आहे. या मुद्याला हात घालत किशोर तिवारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पत्र पाठवून त्यांना आवरण्याची विनंती केली आहे. त्यासाठी किशोर तिवारींनी भाजपातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या जोडीदाराच्या आदर्श वर्तनाची आठवण करून दिली.

भैय्याजी जोशींना भेटणार
अमृता फडणवीसांकडून हे अपेक्षित नाही. त्यांनी त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य थोड्या दिवसासाठी आवरावे.  अशाने देवेंद्र फडणवीस यांचे करियर खराब होईल. भाजपच्या खूप ज्येष्ठ नेत्यांना ही चिंता आहे. प्रवक्ते भूमिका मांडतील, असे या गटाचे ही म्हणणे आहे. पत्नीने खुलासे का करावे? असा सवाल तिवारींनी केला आहे. तिवारी म्हणाले की, या संदर्भात मी भैय्याजी जोशींना भेटणार आहे.  देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा नंतर माज आला. आधीचे देवेंद्र आता राहिले नाहीत.
-  किशोर तिवारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT