file photo 
विदर्भ

आगामी हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार; शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे

सूरज पाटील

यवतमाळ : सोयाबीन पिकाने कधी नव्हे, तो शेतकऱ्यांना धक्का दिला. खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारण्यात आले. दुबार पेरणी करूनही शेतकऱ्यांच्या हातात काहीच उत्पन्न पडले नाही. पेरले तितकेही उगवले नाही, अशी परिस्थिती असताना आता कृषी विभागाकडून बियाणे राखून ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आगामी हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची चिंता व्यक्त होत आहे.

दिवाळी व दसरा या सणांच्या धामधुमीत सोयाबीनचे पीक घरात येत असल्याने शेतकरी या पिकाची लागवड करतात. घरात आलेल्या शेतमालाची विक्री करताच हातात पैसा पडत असल्याने शेतकरी या पिकाला नगदी पीक म्हणून संबोधत पेरणीला पसंती देतात. यंदा मात्र, याच नगदी पिकाने शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटले.

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारण्यात आल्याने दुबार पेरणीची वेळ आली. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी करीत नुकसानभरपाईची मागणी केली. प्रशासनाने पिकांची पाहणी करून आपला अहवाल दिला. राज्य सरकारनेही बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेत. प्रत्यक्षात काहीच निष्पन्न झाले नाही.

शेंगांना कोंब फुटले

पीक वाढत असताना हिरव्या शेंगांना कोंब फुटले. बहुतांश भागांत शेंगात दाणेही निघाले नाहीत. लागवडीचा खर्च निघावा, या उद्देशाने शेतकऱ्यांनी काढणी केली. मात्र, पेरले तितकेही बियाणे निघाले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची चिंता सतावत असताना कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून ठेवा, घरचेच बियाणे वापरा, असा सल्ला देण्यात येत आहे.

बियाणे विक्री करायची नाही

पेरले तेच उगवले नाही. घरात बियाणेच राहणार नाही, तर पेरायचे तरी काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बोगस बियाणे विक्रीचा आरोप झाल्याने कृषी कंपन्यांनी सोयाबीन बियाणे विक्री करायची नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून सावधगिरी बाळगली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


घरचे बियाणे तीन वर्षांपर्यंत वापरा

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत शेतकरी वर्गात जनजागृती करण्यात येते. घरचे बियाणे तीन वर्षांपर्यंत वापरता येते. घरचे बियाणे पेरणी केल्यास पेरणीच्या खर्चातही बचत होईल. त्यात शेतकऱ्यांचा फायदाच आहे.
- राजेंद्र माळोदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, यवतमाळ.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saving Scheme : सरकारी हमीची सुरक्षित गुंतवणूक योजना! मिळेल ८२,००० रुपये व्याज आणि १.५ लाखांची करसवलत

जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, प्रलंबित बदली प्रक्रिया लवकरच सुरू होणार, तीन वर्षांची प्रतीक्षा संपणार?

Latest Marathi News Live Update : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय- सुनील तटकरे

Thane Politics: काँग्रेसला जबर धक्का! ११ नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपात दाखल

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा हट्ट अन् भिकेला लागले खेळाडू... BCCI शी पंगा घेणं पडलं महागात, याला म्हणतात 'तोंड दाबून बुक्क्याचा मार'...

SCROLL FOR NEXT