liquorshop. 
विदर्भ

चार दिवस दारू नाही घेतली तर काय बिघडले? दारू दुकाने बंद करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ - कोरोनाची गती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला अटकाव करण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे. जमावबंदी रोखण्याचाही आदेश सरकारने काढला आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णरू घेण्यात येत आहे. दारूच्या दुकानांमध्ये मात्र प्रचंड जमाव असतो आणि त्यामुळे तिथुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. कोरोना विषाणू रोखण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहेच, त्यामुळे महाराष्ट्रातील दारू दुकाने आणि बार थेट बंद करण्यात यावेत अशी थेट मागणी स्वामींनी संघटनेचे मुख्य संयोजक महेश पवार यांनी केली आहे .

सविस्तर वाचा - नागपुरात सामाजिक, राजकीय, धार्मिक सभांना बंदी...प्रशासनाने दिले हे आदेश
स्वामींनी संघटनेचे मुख्य संयोजक महेश पवार यांनी मुख्यमंत्र्याना थेट मेल पाठवीत दारूची दुकाने आणि बार बंद करण्याची मागणी केली आहे .काही वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी स्वामींनी संघटनेने मोठी चळवळ उभी केली होती . यवतमाळ येथे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 अन्वये एका ठिकाणी लोकांची गर्दी होण्याचे टाळण्यासाठी नगर पालिका नगर पंचायत क्षेत्रालगतचे बार आणि रेस्टारंट सायंकाळी 8 वाजेपर्यंत चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही आंशिक बंदी अपुरी असून बार सरसकट बंद करण्याची मागणी केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT