चंद्रपूर : मानधनवाढीच्या प्रश्नाला घेऊन उपोषणाला बसलेल्या आशा, गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारी (ता. 9) जेलभरो आंदोलन केले. शेकडो महिलांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. शेवटी पोलिसांनी महिलांना अटक केली. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
मानधनवाढीच्या प्रश्नाला घेऊन मागील तीन दिवसांपासून आशा, गटप्रवर्तकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मात्र, त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. राज्यभरात आशा, गटप्रवर्तकांनी तीन सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. आशा कर्मचाऱ्यांचे मानधन तिप्पट करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. त्याची अंमलबजावणी निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी करावी, सेवेत कायम करावे, आशांना दहा हजार, तर गटप्रवर्तकांना पंधरा हजार रुपये मानधन द्यावे या मागण्यांना घेऊन हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. पाच दिवस लोटून गेले तरी याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी आझाद बागेतून मोर्चा निघाला. सरकारविरोधात नारेबाजी करीत मोर्चा जिल्हा परिषदेसमोर पोहोचला. तेथे महिलांनी नारेबाजी करीत ठिय्या मांडला. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे, संतोष दास, प्रा. नामदेव कन्नाके, देवराव चवरे, दिलीप परचाके, देवराव चवरे, राजू गैनवार, अमोल मारकवार, प्रकाश रेड्डी, ममता भिमटे, मनीषा नंदगिरवार, कल्पना मिलमिले, सुनंदा मिलमिले, प्रतिभा कायरकर, वैशाली जुपाका, प्रवीण सय्यद, रजनी गेडाम, वैशाली दरवडे, संगीता मेश्राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.