file photo
file photo 
विदर्भ

आठ दिवस पुरेल एवढाच औषधाचा साठा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील इएसआयसी रुग्णालयांची अवस्था वाईट झाल्याने कामगारांना हक्काच्या सुविधा मिळत नाही आहे. कामगार रुग्णालयातील डॉक्‍टरपासून तर सफाईगारापर्यंतचे 50 टक्के कर्मचारी निवृत्त झाले आहेत. उपचाराची बिले वर्षानुवर्षे मंजूर न होताच धूळखात पडून राहत असल्याने कामगारांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. आता अवघे 8 ते 10 दिवस पुरेल एवढाच औषध साठा शिल्लक असल्याने कामगार हवालदिल झाले आहेत.
कर्मचारी राज्य विमा निगम ही संस्था 1952 मध्ये अमलात आली. सुरुवातीपासून तर आतापर्यंत कामगारांच्या दरमहा वेतनातून शंभर रुपयांमागे मालकाचे 4.75 पैसे तर कामगाराचे 1.75 पैसे असे एकूण 6.50 पैसे कपात होते. कमीत कमी 21,000 पर्यंत दरमहा वेतन असलेल्या कामगार व कुटुंबीयांना या योजनेचा लाभ घेता येतो. कामगारांच्या पगारातून रक्कम कपात केली जात असली तरी सुविधेचा फारसा लाभ मिळत नाही. विदर्भासाठी नागपुरातील सोमवारीपेठेतील एकमेव राज्य कामगार रुग्णालय आहे. विदर्भातील असंघटित क्षेत्रातील कारखाने, उद्योगांमध्ये तीन लाखांवर कामगार व कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी रुग्णालयावर आहे.
कामगार रुग्णालये चालविणे राज्य सरकारला तोट्याचे नाही; मात्र राज्य सरकारची इच्छाशक्ती नसल्यानेच आता राज्य कामगार विमा रुग्णालयांची सोसायटी तयार करण्यात आली. कामगारहिताच्या आरोग्य सोयी पुरवण्यात आता सोसायटीदेखील हतबल झाली आहे. सरकारी रुग्णालयांना आवश्‍यक सर्जिकल साहित्य आणि औषध खरेदीचे अधिकार हापकिनकडे दिल्याने कामगार विमा रुग्णालयात अवघे 10 दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. इंटकचे सचिव मुकुंद मुळे यांनी नाराजी व्यक्त केली करीत आठवडाभरात औषध न आल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT