Students school bag will be light
Students school bag will be light 
विदर्भ

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे होणार हलके; नवीन शैक्षणिक सत्रापासून होणार अंमलबजावणी

रूपेश खैरी

नंदोरी (जि. वर्धा) : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे पालकांनी आनंद व्यक्‍त केला असला तरी त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी त्यांच्यासह शिक्षक व शिक्षणतज्ज्ञ यांनी व्यक्त केली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच दिले आहेत. त्यानुसार पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे त्यांच्या शारीरिक वजनाच्या १० टक्क्क्‍यांहून जास्त नको, असे स्पष्ट केले आहे. सर्व राज्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य शासनाने नोव्हेंबर २०१४ मध्ये दप्तराचे ओझे अभ्यास गट समिती स्थापन केली होती. अभ्यास गटाने राज्यातील वेगवेगळ्या भागात सर्वेक्षण करून शासनास अहवाल सादर केला. दप्तराचे वजन मुलांच्या वजनाच्या १० टक्‍यांपर्यंतच असले पाहिजे अशी शिफारस त्यांनी केली. या अहवालाचा विचार करून शासनाने जुलै २०१५ मध्ये दप्तराचे ओझे कमी करण्याचा आदेश केला. मात्र, तपासणी करणारी यंत्रणा व त्यासाठीचे निकष तयार केले नाहीत. 

आदेश होऊनही अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी हा कायदा कागदावरच राहिला. दप्तराचे ओझे कमी करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हायची असेल तर शिक्षण संस्था, शिक्षक व पालक यांच्या मानसिकतेत बदल घडविणे आवश्‍यक आहे.

असे शिक्षण तज्ञांना वाटते. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत दप्तराचे ओझे कमी करण्याच्या निर्णय संदर्भात शाळांची अधिकारी व पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत तपासणी केली जाणार आहे. शिक्षण विभागाकडून याबाबतचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे.

यापूर्वीही घेतला होता निर्णय

दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत राज्य शासनाने आधीच निर्णय घेतला आहे. परंतु, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही. केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार घेतलेला निर्णय चांगला व योग्य आहे. पुस्तकी अभ्यासाबरोबरच खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर स्पर्धा परीक्षांचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. आवश्‍यक पुस्तके आणि वह्या विद्यार्थ्यांना आणण्यास सांगितले जावे, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT