swabhimani leader ravikant tupkar reaction on farmers agitation  
विदर्भ

Bharat Bandh Updates : 'चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस अडवणे हा फक्त ट्रेलर होता, आता दिल्लीला जाणारी प्रत्येक रेल्वे अडवू'

अतुल मेहेरे

नागपूर : गेल्या १२ दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीत राजधानी दिल्लीच्या सीमांवर न्यायासाठी बसलेला आहे. केंद्र सरकार चर्चेत वेळ घालवत आहे. आज बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावर आम्ही चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस अडवली आहे. यापुढे दिल्लीला जाणारी प्रत्येक रेल्वे अडवू, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केंद्र सरकारला दिला. 

लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर आलेला असताना सरकारला चर्चेत वेळ कसा घालवावा वाटतो? सरकार आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे आंदोलन आणि यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांमुळे जागतिक पातळीवर केंद्र सरकारची प्रतिमा मलिन झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. सरकारने पारित केलेले कृषी विधेयक मागे घ्या, एवढेच शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात शेतकऱ्यांना घालण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे, असेही ते म्हणाले.  

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल सरकारने वेळीच घेतली असती तर आज भारत बंद करण्याची वेळ आली नसती. सरकारच्या हेकेखोरपणामुळेच देशाला आजचा बंद पाहावा लागत आहे. आज नवजीवन एक्सप्रेस अडवून आम्ही केंद्र सरकारला इशारा दिला आहे की, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढला नाही, तर दिल्लीकडे जाणारी सर्व वाहतूक रोखून धरली जाईल. एकही रेल्वे दिल्लीत पोहोचू दिली जाणार नाही, हा निर्धार आज स्वाभिमानीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आज केला, असेही ते म्हणाले.

दिल्लीतील आंदोलन दिवसागणिक चांगलेच चिघळत चालले आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद विदर्भातील गावखेड्यांतही उमटले आहेत. आज विदर्भातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे भारत बंद पाळला. राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी  शांतीपूर्ण मोर्चे काढून दुकानदारांनाही बंद ठेवण्याचे आवाहन केले, त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीवर स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली असून राजू शेट्टी यांनी आज कृषी विधेयकाची होळी केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Uttar Pradesh : CM योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा; शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेली TET परीक्षेविरूद्ध दाखल करणार पुनर्विचार याचिका

Nano Banana AI 3D Video Prompt: मॉडेल इमेजेसनंतर आता 3D व्हिडिओ ट्रेंड, एका मिनिटापेक्षा कमी वेळात तयार करा खास व्हिडिओ

SCROLL FOR NEXT