file photo 
विदर्भ

टार्गेट साडेदहा कोटींचे; वसुली 60 लाखांची

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांनी लाटलेल्या विविध योजनांचा निधी परत करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले टार्गेट पूर्ण होत नसल्याची माहिती समोर आली आहे. 10 कोटी 50 लाखांची वसुली असताना, प्रत्यक्षात 60 लाखांचीच वसुली झाल्याचे समजते.
राज्यात तीन ते पाच ऑक्‍टोबर 2011 या कालावधीत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पटपडताळणी मोहीम राबविली होती. यात 20 टक्‍केपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या बऱ्याच शाळा आढळल्यात. या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारकडून 2012 मध्ये घेण्यात आला होता. विशेष म्हणजे, बऱ्याच शाळा बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यात प्राथमिकच्या 107 व माध्यमिकच्या 52 शाळा पटपडताळणीत दोषी असल्याचे आढळले.
कारवाईविरुद्ध काही शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने शिक्षण विभागाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश बजाविले आहेत. मात्र, शिक्षणाधिऱ्यांनी शाळांकडून योजनेच्या लाभाची रक्‍कम चलनासह सादर करण्याबाबातचे आदेश प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी काढले होते. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना वांरवार रक्‍कम जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, शाळांकडून अंमलबजावणी करण्यास चालढकल करण्यात येत आहे. प्राथमिक शाळेकडून 44 लाख तर माध्यमिक शाळांकडून 16 लाखांची वसुली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT