TejbirSingh said now where did Mahatma Gandhi and Bhagat Singh come together 
विदर्भ

तेजबीरसिंग म्हणाले, आता कुठे महात्मा गांधी आणि भगतसिंग एकत्र आले

सकाळ डिजिटल टीम

वर्धा : शेतकरी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी शेतकरी नेते राकेश टीकेत यांची महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यात शेतकरी मोठ्या सख्येने सहभागी होतील याची भीती शासनाला असल्याने कोरोनाचे कारण काढून त्यांची पंचायत रद्द करण्याचा रडीचा डाव खेळल्याचा आरोप दिल्ली येथून विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले हरियाना भारतीय किसान आंदोलनाचे प्रवक्ता तेजबीरसिंग यांनी केला.

बजाज चौक परिसरात दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वर्ध्यातील ४० संस्थांनी एकत्र येत ६८ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात दिल्ली येथून आलेल्या शेतकऱ्यांनी यवतमाळपर्यंत काढलेली रॅली वर्ध्यात दाखल झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी संयुक्त किसान मोर्चाचे श्रीकांत तराळ, महासंयुक्त मोर्चाचे अध्यक्ष संदीप गिट्‌टे पाटील, पंजाब प्रांतातील नेते अमनदिपसिंह घुम्मत, उत्तर प्रदेशचे किसान नेते गुरुअमनीतसिंह मांगत, गुरुद्वारा प्रमुख गुरुविंदरसिंग, रवींद्रसिंग आदींनी मार्गादर्शन केले.

आंदोलन मंडपात अतिथीचे स्वागत करण्यात आले. आंदोलनाची भूमिका आणि शासनाचा डाव महासंयुक्त मोर्चाचे अध्यक्ष संदीप गिट्टे पाटील यांनी विषद केली. संचालन यशवंत झाडे यांनी केले. आभार किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी केले. संजय भगत, असलम पठाण, पूजा जाधव, प्रा. सूचीता ठाकरे, विद्या राईकवार, ललिता कुकडे, श्रेया गोडे यांनी परिवर्तनाची गीते सादर केली.

आंदोलनाची खरी सुरुवात

वर्धा ही महात्मा गांधी आणि पंजाब भगतसिंहाची भूमी आहे. या भूमितील शेतकऱ्यांची आता कुठे भेट झाली आहे. ही तर पुकारलेल्या आंदोलनाची खरी सुरुवात आहे. हे आंदोलन इथेच थांबणार नाही तर ही लढाई वर्षानुवर्ष चालणारी आहे. यामुळे सर्वांनी एकजूट होऊन या शासनाची कबर खोदण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी संस्थाचा मोठा निर्णय; मंदिर २४ तास भक्तांसाठी खुलं राहणार!

SCROLL FOR NEXT