There is no cemetery in Umali Village 
विदर्भ

इथं मरणानंतरही होतात हाल...

संजय जाधव

बुलडाणा : देश डिजिटल जगाकडे निघाला असताना राज्यातील काही गावे अशी आहेत, जिथे साधा रस्ता तर नाहीच पण, मरणानंतरही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधी स्मशानभूमीही नाही. अशी स्थिती मलकापूर तालुक्यातील उमाळी गावाची आहे. विशेष म्हणजे हे गाव आमदारांनी दत्तक घेतलेले आहे.

गावातील उमाळी येथील वासुदेव रामभाऊ उंबरकर यांचे बुधवारी (दि. 28) वयाच्या 82व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुडघाभर साचलेल्या पाण्यातून काढावी लागली. अंत्ययात्रेत सहभागी असलेल्या लोकांच्या मुखातून 'राम बोलो भाई राम' ऐवजी तीव्र संताप व्यक्त होत होता. मृतदेहाचा अंत्यविधी उघड्यावरच करण्यात आला. त्यावेळी अचानक पाऊस आल्याने तारांबळ उडाली.

बाकीची विकासकामे होतील तेव्हा होतील पण, निदान मृत्यूनंतर तरी शांतपणे जळण्यासाठी, ऊन, वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी स्मशानभूमी बांधावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.

ही तर लाजीरवाणी गोष्ट...
आजोबांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना. अंत्यसंस्कारासाठी जाताना गुडघाभर पाणी, चिखलातून जावे लागले. गावाला स्मशानभूमी नसणे, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे आणि गावाला लवकर स्मशानभूमी बांधून दिली.
- प्रशांत उंबरकर, गावकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे टोमणे मारणे आणि टीका करण्यापलिकडे काही करू शकत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा टोला

Indian Stock Market Opening : शेअर बाजारात हिरव्या रंगात उघडला; सेन्सेक्स 330 अंकांनी वाढला; जाणून घ्या कोणते शेअर्स तेजीत?

Latest Marathi Live Update News: नाशिककरांसाठी महत्त्वाची सूचना: शनिवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद

Wardha Accident: कंटेनर-कार अपघातात तीन मित्र ठार; अल्लीपूर -धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळची घटना

India vs Australia 4th T20: आता शुभमन गिलच्या फॉर्मची प्रतीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया आज चौथा टी-२० सामना, आघाडीसाठी प्रयत्न

SCROLL FOR NEXT