विदर्भ

त्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची! : हंसराज अहीर 

राजकुमार भीतकर

यवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले. भाजपच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनीही वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्‍वभूमिवर बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वन्यजीवप्रेमींना वन्यप्राण्यांची चिंता होती; तर आम्हाला माणसांची होती असे मत व्यक्त करून वनमंत्र्यांची पाठराखण केली. ते मंगळवारी (ता. 13) येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, उद्धव येरमे व अमोल ढोणे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना अहीर म्हणाले की, अवनीने 13 लोकांचे बळी घेतले. ती नरभक्षक झाल्याने तिला ठार करावे अशी लोकांचीच मागणी होती. वाघीणीला ठार करावे, अशी सरकारची इच्छा नव्हती. परंतु, सरकारला वन्यप्राण्यांपेक्षा माणसांचे जीव महत्त्वाचे होते, असे सांगून त्यांनी राज्यसरकाची पाठ थोपटली. 

पुढे अहीर म्हणाले की, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार नाहीत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तसे संकेत दिले आहेत. भाजप केंद्रात सत्तेवर आल्यापासून विधानसभेच्या निवडणुका जिंकत आहेत, आगामी सर्व निवडणुका जिंकणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. कर्नाटक पोटनिवडणुकीतील पराभवाबद्दल बोलताना ते म्हणाले की, सत्तर वर्षांच्या इतिहासात सत्ताधारी पक्षाचा पोटनिवडणुकीत पराभवच झाला आहे.

शिवसेना-भाजपसोबतच
शिवसेना भाजप युती ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सुरू केली आहे. ती कायम राहणार असून यावेळी शिवसेना व भाजप एकत्रच निवडणूक लढेल. आजही सोबत लढू व भविष्यातही सोबतच राहू, असा विश्‍वास हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा सरकारला कडक इशारा! दोषमुक्तीच्या याचिकांवर विलंब केला तर थेट अवमान कारवाई... इतर राज्यांना संदेश

Washim News: सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाची एन्ट्री;जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; दिग्गजांना हादरा

Latest Marathi News Live Update : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची सर्व तयारी पूर्ण; उद्या मुख्य यात्रा

Pimpri News: अपघात आणि बेपत्ता नोंद एकाच पोलीस ठाण्यात, तरी तपासाची तसदी घेतली नाही; CRPF जवानाच्या मृत्यूचा ५ दिवसांनी उलगडा..

Buldhana News: तहसीलदारावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न; रेतीमाफियांची मुजोरी वाढली; सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले वाहन

SCROLL FOR NEXT