tivsa zilla parishad school wall building dangerous class students going to other school
tivsa zilla parishad school wall building dangerous class students going to other school Sakal
विदर्भ

Amravati School News : तिवसा येथील जि.प. शाळेची इमारत जीर्ण; दीडशे वर्षे उलटूनही नूतनीकरण नाही

प्रशिक मकेश्वर

तिवसा : शहरातील अगदीच राष्ट्रीय महामार्गा लागत असलेल्या तिवसा पूर्व माध्यमिक जिल्हा परिषद शाळेला जवळपास दीडशे वर्ष उलटून गेली आहे. मात्र अजूनपर्यंत या शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण झाले नाही,

परिणामी पालकांना देखील पडक्या शाळेत आपल्या काळजाच्या तुकड्याला पाठवायचे कसे हा प्रश्न पडतो आहे.त्यामुळे तातडीने शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण करावे अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

हळूहळू इंग्रजी शाळेमुळे जिल्हा परिषद शाळेचे महत्व कमी होत असल तरी आज ही ग्रामीण भागातील पालक हे मोठ्या आशेने आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवतात परंतु सध्या सर्वीकडे शाळेच्या वर्ग खोल्याची परिस्थिती ही फार वाईट असून अनेक इमारती या जीर्ण झाल्या आहेत.

तिवसा शहरातील १८६८ पासून असलेल्या जिल्हा परिषद शाळेत आठ वर्ग खोल्या आहेत. ज्यामध्ये पहिली ते सातवी पर्यंतच शिक्षण दिल्या जाते मात्र यातील खोल्या अतिशय धोकादायक स्थितीत असून कधी शाळेच्या भिंती पडून दुर्घटना होईल हे सांगता येत नाही.

शाळेवरचे छप्पर नाही, भिंतीला तळे गेले, छप्परचे लाकूड सडले अश्या जीर्ण झालेल्या वर्ग खोल्यात मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण द्यावे लागत आहे. अशातच कुठली दुर्घटना घडली आणि त्यात जीवितहानी झाली तर जबाबदार कोण असा ही सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

पटसंख्येत सातत्याने घट

येथील तिवसा पंचायत समिती अंतर्गत तालुक्यात सुमारे ७६ जिल्हा परिषद शाळा असून यातील जास्त करून शाळेच्या वर्ग खोल्या या जीर्ण होऊन भिंती पडल्या, कुठे शाळेला छत नाही, एकाच वर्ग खोलीत अनेक मुलांना शिक्षण द्यावे लागत आहे. यामुळे शाळेच्या पटसंख्येवर देखील सातत्याने परिणाम होतो. यात २०२१ वर्षात शाळेत १६२,२०२२ मध्ये १४८ तर आता १२० पट संख्या आहे. त्यामुळे आता शासनाने याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

शाळेकडून आठ ही वर्ग खोल्याचे डिसमेंटल प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. ज्यामध्ये चार वर्ग खोल्या डिसमेंटल मंजूर असून लवकरच त्याचे काम सुरु होईल अशी आशा आहे. परंतु अजूनपर्यंत कुठलेही पत्र प्राप्त झाले नाही.

- राजेंद्र नकाशे, मुख्याध्यापक.

गेल्या कित्येक वर्षापासून या शाळेच्या खोल्या या अतिशय धोकादायक स्थितीमध्ये असून त्या केव्हाही पडू शकतात अशी परिस्थिती सध्या तिवस्याच्या जिल्हा परिषद शाळेची आहे. त्यामुळे अशा जीर्ण झालेल्या शाळेत मुलांना कस पाठवावे हा विचार येतो. कुठलीही हानी झाली तर त्याची जबाबदारी कुणाची?

- दीपक पानबुडे, पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT