tur rate across 13 thousand farmer trader benefit yavatmal agriculture Sakal
विदर्भ

तुरीच्या दराने गाठली बाराहजारी; शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच फायदा

तुरीचा हंगाम बाजारभावामुळे चर्चेत असतो. या हंगामात तूर शेतकऱ्यांना तारताना दिसत आहे. यंदा कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू आदी पिकांमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झालेले नाही.

चेतन देशमुख : सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शेतमालाचे भाव कमी होत असताना तुरीच्या दराने झेप घेतली आहे. तुरीच्या दराने बाराहजारी ओलांडली आहे. दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. बाजारभावातील तेजी पाहता लवकरच दर १३ हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुरीचा हंगाम बाजारभावामुळे चर्चेत असतो. या हंगामात तूर शेतकऱ्यांना तारताना दिसत आहे. यंदा कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू आदी पिकांमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. ज्या शेतकऱ्यांना उत्पन्न झाले, त्यांना भाव नसल्याने कमी दरात शेतमाल विकावा लागला आहे. कापसाचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

मात्र, हंगाम संपला तरी कापसाच्या दरात वाढ झालेली नाही. उलट कापसाचे दर खाली आले आहे. कापूस, सोयाबीन, हरभऱ्याच्या तुलनेत तुरीला सुरवातीपासूनच समाधानकारक दर होते. गेल्या काही दिवसांत तुरीच्या दरात अचानक तेजी आली आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांना अच्छेदिन आल्याचे दिसून येत आहे.

मात्र, तूरदरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होणार असल्याचे दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आधीच तूर विकली आहे. खरीप पेरणीच्या तोंडावर असताना फार कमी शेतकऱ्यांकडे तूर आहे.

यामुळे या दरवाढीतून शेतकऱ्यांना फारसे काही मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीत तुरीला शुक्रवारी (ता. १७) ११ हजार ५०० ते १२ हजार ३०० रुपये दर मिळाले आहे. यवतमाळ बाजार समितीत तुरीला यंदाच्या हंगामातील विक्रमी दर मिळाला आहे.

या हंगामात तूर दहा हजार रुपये प्रतिक्विंटलच्या जवळ पोहोचली होती. तुरीचे दर वाढतील असा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला होता. तो आता खरा होताना दिसत आहे. तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बाजार समितीतील तुरीचे दर (प्रतिक्विंटल)

  • यवतमाळ- १२३००

  • अमरावती- १२०५०

  • कारंजा- १२५००

  • मानोरा- १२०००

  • शेगाव- ११६०५

  • अकोला- ११९७०

शेतकऱ्यांना या हंगामात एकाही पिकाला चांगले भाव मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघालेला नाही. कापूस, सोयाबीन या महत्त्वाच्या पिकांचे दर घसरले आहे. आता कुठे तुरीच्या दरात तेजी आली आहे. यातून काही प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेल. बाजार समिती यासाठी प्रयत्‍न करत आहे.

-प्रवीण देशमुख, माजी संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT