tur rate across 13 thousand farmer trader benefit yavatmal agriculture Sakal
विदर्भ

तुरीच्या दराने गाठली बाराहजारी; शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच फायदा

तुरीचा हंगाम बाजारभावामुळे चर्चेत असतो. या हंगामात तूर शेतकऱ्यांना तारताना दिसत आहे. यंदा कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू आदी पिकांमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झालेले नाही.

चेतन देशमुख : सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शेतमालाचे भाव कमी होत असताना तुरीच्या दराने झेप घेतली आहे. तुरीच्या दराने बाराहजारी ओलांडली आहे. दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. बाजारभावातील तेजी पाहता लवकरच दर १३ हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुरीचा हंगाम बाजारभावामुळे चर्चेत असतो. या हंगामात तूर शेतकऱ्यांना तारताना दिसत आहे. यंदा कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू आदी पिकांमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. ज्या शेतकऱ्यांना उत्पन्न झाले, त्यांना भाव नसल्याने कमी दरात शेतमाल विकावा लागला आहे. कापसाचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

मात्र, हंगाम संपला तरी कापसाच्या दरात वाढ झालेली नाही. उलट कापसाचे दर खाली आले आहे. कापूस, सोयाबीन, हरभऱ्याच्या तुलनेत तुरीला सुरवातीपासूनच समाधानकारक दर होते. गेल्या काही दिवसांत तुरीच्या दरात अचानक तेजी आली आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांना अच्छेदिन आल्याचे दिसून येत आहे.

मात्र, तूरदरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होणार असल्याचे दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आधीच तूर विकली आहे. खरीप पेरणीच्या तोंडावर असताना फार कमी शेतकऱ्यांकडे तूर आहे.

यामुळे या दरवाढीतून शेतकऱ्यांना फारसे काही मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीत तुरीला शुक्रवारी (ता. १७) ११ हजार ५०० ते १२ हजार ३०० रुपये दर मिळाले आहे. यवतमाळ बाजार समितीत तुरीला यंदाच्या हंगामातील विक्रमी दर मिळाला आहे.

या हंगामात तूर दहा हजार रुपये प्रतिक्विंटलच्या जवळ पोहोचली होती. तुरीचे दर वाढतील असा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला होता. तो आता खरा होताना दिसत आहे. तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बाजार समितीतील तुरीचे दर (प्रतिक्विंटल)

  • यवतमाळ- १२३००

  • अमरावती- १२०५०

  • कारंजा- १२५००

  • मानोरा- १२०००

  • शेगाव- ११६०५

  • अकोला- ११९७०

शेतकऱ्यांना या हंगामात एकाही पिकाला चांगले भाव मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघालेला नाही. कापूस, सोयाबीन या महत्त्वाच्या पिकांचे दर घसरले आहे. आता कुठे तुरीच्या दरात तेजी आली आहे. यातून काही प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेल. बाजार समिती यासाठी प्रयत्‍न करत आहे.

-प्रवीण देशमुख, माजी संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT