वनोजाबाग (जि. अमरावती) : क्षमतेपेक्षा अधिक माल भरून ट्रक चालवल्यामुळे ट्रकचे होणारे अपघात हा नेहमीचाच प्रश्न आहे. अनेकदा ट्रकमध्ये खूप जास्त माल भरला जातो आणि वळणावर ट्रक वळवताना ट्रक चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटते आणि गंभीर अपघात होतात. असाच भीषण अपघात नुकताच झाला आणि ट्रकमधील माल त्या अपघातात जळून खाक झाला.
कोरोनाच्या संकटाने देशाचेच काय जगाचेही कंबरडे मोडले आहे. सगळी आर्थिक गणिते विस्कटली आहेत, त्यातच एका अपघातात तुर डाळ जळून खाक झाली आणि आणखी नुकसान झाले.
अवश्य वाचा - तुम्ही रोगयुक्त फळे तर खात नाही ना?
अकोला येथून लकिमपूर (मध्य प्रदेश) येथे 25 टन तुरीची डाळ घेऊन जाणारा ट्रक अंजनगाव ते आकोट रोडवरील सातेगाव फाट्यानजीक पलटी झाला. या ट्रकला लागलेल्या आगीत तूरडाळ पूर्णपणे खाक झाल्याने ट्रकसह तूरडाळीचे अंदाजे 35 ते 40 लाखांचे नुकसान झाले.
अकोला येथून 25 टन तूरडाळ घेऊन जाणाऱ्या ट्रकचे (क्रमांक ः एचएम 09- पी 8693) स्टेअरिंग लॉक झाल्याने तो सातेगाव फाट्यानजीक पलटी झाला. ही घटना शनिवारी (ता. 2) रात्री घडली. तूरडाळीने भरलेला ट्रक रात्री रस्त्याच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक खांबावर धडकला. त्यामुळे इलेक्ट्रिक खांबावरील तारांचे स्पार्किंग झाल्याने आगीचे गोळे ट्रकवर पडल्याने आग लागली आणि ट्रकमधील तूरडाळीचे पोते व ट्रक जळून खाक झाला. सुदैवाने ट्रकचालक व क्लिनरने ट्रकमधून उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले. या अपघातात 20 लाख रुपयांची डाळ व ट्रकचे नुकसान धरून जवळपास 35 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाले. पुढील तपास अंजनगावसुर्जीचे पोलिस निरीक्षक जावरे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.