वर्धा : जिल्ह्यातील सेवाग्राम परिसरात कारचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जखमी झाले. ते नागपूर जिल्ह्यातील बेला धरणावर फिरायला गेले होते. त्याठिकाणावरून परताना कारचा अपघात झाला असून सेवाग्राम पोलिसांनी याची नोंद घेतली आहे.
अचल रमाकांत पाडे (४४) आणि सुशील मोहन अड्याळकर (३५), असे मृतांची नावे आहेत, तर संतोष सोनछात्रा, जितू चैनाणी, अमोल पालिवाल, अशी जखमींची नावे असल्याची माहिती आहे. अचल पांडे, सुशील अड्याळकर, संतोष सोनछात्रा, जितू चैनाणी आणि अमोल पालिवाल हे पाच मित्र संतोष सोनछात्रा यांच्या मालकीच्या कारने फिरण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील बेला धरणावर गेले होते. येथे दिवसभर भ्रमंती झाल्यानंतर ते परतीला निघाले असता त्यांच्या कारला अपघात झाला. यावेळी कारमधील संतोष सोनछात्रा, जितू चैनाणी, अमोल पालिवाल या तिघांनी गंभीर जखमी असलेल्या अचल पांडे आणि सुशील अड्याळकर या दोघांना मिळालेल्या मदतीच्या आधाराने सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.